शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

उद्धव ठाकरेंना चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न, भास्कर जाधव म्हणाले आता..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 18:30 IST

आज शिवसेना वाईट परिस्थितीतून जात आहे. अनेकजण शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत.

चिपळूण : सध्या शिवसेनेचा संक्रमणाचा काळ सुरू आहे. पक्ष अडचणीत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशावेळी नेतृत्वासाठी वाद किंवा आपापसात हेवेदावे करण्यापेक्षा सर्वानी एकत्र येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने खंबीरपणे उभे राहाण्याची वेळ आहे, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.गुहागर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील शिवसेनेच्या नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा काल, गुरुवारी शहरातील माटे सभागृह येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, माझ्या ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मी कधीच कोणाकडे मला अधिकार द्या, नेतृत्व करण्याची संधी द्या, अशी मागणी केली नाही. नेतृत्वासाठी कोणाच्या आड कधी आलो नाही. मी स्वतः माझे नेतृत्व सिद्ध केले आहे. यासाठी मला चिपळूणच कशाला राज्यात कोठेही मी लाथ मारीन तेथे पाणी काढीन हे सदानंद चव्हाण यांनाही माहिती आहे. त्यामुळे चिपळूणच्या नेतृत्वाचा सध्या कोणताही वाद नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.आज शिवसेना वाईट परिस्थितीतून जात आहे. अनेकजण शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत. उध्दव ठाकरे यांना चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा वेळी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

आता वादविवाद करण्याची, आपापसात गैरसमज करण्याची किंवा कोणतेही निमित्त शोधण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्र येऊन शिवसेना मजबूत करण्याची, शिवसेनेला लागलेले ग्रहण दूर करण्यासाठी जीवाचे रान करण्याची गरज आहे. पक्ष वाचविणे व मजबूत करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. भांडणासाठी, वाद करण्यासाठी संपूर्ण आयुष्य आहे. आताचा काळ कठीण असल्याने सर्वांनी एकत्र येऊन शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची वेळ आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाBhaskar Jadhavभास्कर जाधव