शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

रत्नागिरी : निर्मल सागर तट अभियान मोहिमेच्या माध्यमातून हर्णै बंदराला मिळणार शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 6:25 PM

निर्मल सागर तट मोहिमेच्या माध्यमातून हर्णै ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सिल्बरब्राऊर इंडिया, पुणे या कंपनीशी करार केला आहे. लोकांना अल्प दरात शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.

ठळक मुद्देअल्प दरात हर्णै बंदराला मिळणार शुद्ध पाणीनिर्मल सागर तट अभियान मोहिमेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध

दापोली : हर्णै बंदरात दररोज हजारो लोक मच्छी लिलावासाठी येत असतात. स्थानिक मच्छीमार व पर्यटकांना हर्णै बंदरात पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नव्हते. त्यामुळे निर्मल सागर तट मोहिमेच्या माध्यमातून हर्णै ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सिल्बरब्राऊर इंडिया, पुणे या कंपनीशी करार केला आहे. लोकांना अल्प दरात शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.बंदरातील पाणी समस्या दूर व्हावी, यासाठी पाणी  कमिटी अध्यक्ष अस्लम अकबाणी यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. येथे हजारो पर्यटक येत असतात. परंतु बंदरावर शुद्ध पाणी मिळत नव्हते. आता ग्रामपंचायतीने सिल्बरब्राऊर कंपनीशी पाच वर्षांचा करार केल्यामुळे आरो प्लँटमधून शुद्ध पाणी मिळणार आहे.२० ते ३० पैसे दरमच्छीमार व पर्यटकांना केवळ २० ते ३० पैसे दराने शुद्ध पाणी उपलब्ध होणार असल्याने २० रुपये बॉटल घेण्याची गरज नाही. हर्णैतील पाणी समस्या दूर होणार असून, ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी उपलब्ध करुन दिले आहे. हा प्लँट सुरळीत चालावा, यासाठी कर्मचाऱ्यांची २४ तास नियुक्ती करण्यात येणार आहे. 

पाठपुराव्याला यशहर्णै बंदरातील पाणी समस्या दूर झाल्याने लोकांना शुद्ध पाणी मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांची ही मागणी होती. आता ती पूर्णत्त्वास जात असल्याचा आनंद वाटतो. मी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचा आनंद आहेच; परंतु लोकांना अल्पदरात शुध्द पाणी मिळणार, याचे समाधान आहे.- अस्लम अकबाणी,पाणी कमिटी अध्यक्ष

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीfishermanमच्छीमार