शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे चोरटेही घरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन झाले आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा ...

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन झाले आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा परिणाम चोरट्यांवरही झाला आहे. काेराेनाच्या भीतीमुळे चोऱ्यांचेही प्रमाण घटले असल्याचे दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन २०१९ मध्ये ३५६, सन २०२० मध्ये २३३ चाेरीच्या घटना घडल्या हाेत्या. मात्र, एप्रिल २०२१ अखेरपर्यंत केवळ ७८ चोरीच्या घटना घडल्या आहेत.

कोरोनाने सन २०२० मध्ये सगळी आर्थिक गणित बिघडून टाकली होती. पहिले काही दिवस सगळे व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी ‘वर्क फ्राॅम होम’ला प्राधान्य देण्यात आले. जिल्ह्याच्या सीमा सील झाल्या तर पोलीस २४ तास रस्त्यावर तैनात झाले. या सर्व परिस्थितीचा परिणाम सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत झाला. काेराेनामुळे अनेकजण घरात असल्याने चाेरट्यांनीही त्याचा धसका घेतला आहे. त्यामुळे चाेरीचे प्रमाण कमी झाले असून, एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत ७८ चाेरीच्या घटना घडल्याची नाेंद झाली आहे.

..........................

खुनाचे प्रमाण कमी

लाॅकडाऊनच्या कालावधीत खुनाचे प्रमाणही खूप कमी आल्याचे दिसत आहे. सन २०१९ मध्ये १५ खुनाच्या घटना घडल्या हाेत्या. तर सन २०२० मध्ये १७ घटना घडल्या हाेत्या. यावर्षी एप्रिल अखेरपर्यंत केवळ ३ खुनाच्या घटना घडल्या आहेत.

...............................

बलात्काराच्या घटनांमध्येही घट

लाॅकडाऊनमुळे सारेच घरात असल्याने नातेवाइकांचा एकमेकांशी संवाद वाढला आहे. अनेकजण आपल्या कुटुंबातच राहत असल्याने घरी एकटे राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. घरातील माणसे सुरक्षित आहेत. तसेच एकमेकांच्या घरी जाणेही बंद झाले आहे. याचा चांगला परिणाम दिसत असून, बलात्कारांच्या घटनांमध्येही घट झाली आहे. सन २०१९ मध्ये तब्बल ४७ बलात्काराच्या घटना घडल्या हाेता. सन २०२१ मध्ये ३९ हाेत्या तर यावर्षी एप्रिल अखेरपर्यंत २३ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

.............................

लोक सध्या घरात आहेत, तसेच पोलिसांची गस्तही सुरू आहे, हे चोऱ्या कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे. दुसरे कारण असे, की यंत्रणाही मेहनत घेतेय, त्यामुळे चोऱ्यांचा छडा लवकर लागतोय. चोऱ्यांमधील मुद्देमाल जास्तीत जास्त हस्तगत करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरते. गस्तीबरोबरही नाकाबंदी सुरुच आहे. घराच्या आवारात सीसीटीव्ही लावा व त्याचा डिव्हीआर सुरक्षित ठिकाणी ठेवा. नागरिकांनीही सतर्क राहावे. बाहेर जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी.

डाॅ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी