शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषद निवडणुकीत राज्यसभेची पुनरावृत्ती होणार नाही : मंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 18:20 IST

राज्यसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने गणितं जुळली होती, यापेक्षा कुणी जुळवली, हे अख्ख्या देशाने बघितले आहे.

रत्नागिरी : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निष्काळजीपणा घडला, त्यामुळे एक जागा गमवावी लागली. मात्र, विधानपरिषदेच्या निवडणुकीत निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होणार नाही. तसेच राज्यसभा निवडणुकीत गणितं कोणी जुळवली, हे अख्ख्या देशाने पाहिले आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा जिंकेल, असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.ते पुढे म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने गणितं जुळली होती, यापेक्षा कुणी जुळवली, हे अख्ख्या देशाने बघितले आहे. विधानपरिषदेची निवडणूक दि. २० जूनला होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. आमचे दोन्ही सदस्य विधानपरिषदेत जातील. राज्यसभा निवडणुकीत जो निष्काळजीपणा घडला, त्याची पुनरावृत्ती होणार नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.धोपेश्वर रिफायनरीबाबत विरोधक आणि समर्थक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. बहुसंख्य ग्रामस्थ रिफायनरी पाहिजे म्हणून सांगणारे आहेत. बेरोजगारीचा प्रश्न पाहता, तेथील जनतेला हा प्रकल्प हवा असेल, तर मुख्यमंत्री या प्रकल्पाचा विचार करतील, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

नीतेश राणेंना टाेलापर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोद्धा दौऱ्यावरून टीका करणाऱ्या भाजप आमदार नीतेश राणे यांनाही उदय सामंत यांनी टाेला हाणला. ज्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली, त्यांची उंची आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा मोठी आहे असे वाटत नाही, असे उदय सामंत म्हणाले. विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून आदित्य ठाकरे घाबरणार नाहीत, उलट ते दौरा यशस्वी करून परत येतील, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला.

मंदिर हलणार नाहीरत्नागिरी शहरातील मारुती मंदिर अन्य ठिकाणी हलविण्याची नोटीस रत्नागिरी नगरपरिषदेने बजावली असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, अशा प्रकारची कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. तसेच मारुतीचे मंदिर हलविण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष सुभाष वैद्य उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक