शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Ratnagiri: मिऱ्या बंधाऱ्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थ पतन विभागावर धडकले

By शोभना कांबळे | Updated: June 12, 2024 16:15 IST

रत्नागिरी : दरवर्षी पावसाळ्यात मिऱ्यावासीयांच्या डोक्यावर उधाणाची भीती असते. त्यामुळे बंधाऱ्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. ...

रत्नागिरी : दरवर्षी पावसाळ्यात मिऱ्यावासीयांच्या डोक्यावर उधाणाची भीती असते. त्यामुळे बंधाऱ्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. मात्र, निधी मिळूनही मिऱ्या बंधाऱ्याच्या धोकादायक टप्प्याचे काम पावसाळा लागल्यावरही सुरू न झाल्यामुळे मिऱ्या ग्रामस्थांनी पत्तन विभागावर धडक देत गावचे संरक्षण करण्यासाठी बंधाऱ्याचे काम करण्याची मागणी केली. यावेळी पत्तन अधिकाऱ्यांनी यावर लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.मिऱ्या बंधाऱ्याचा पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा अडीचशे मीटरचा टप्पा अपूर्ण आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे साडेतीन किलाेमीटरचे काम करण्यात येणार आहे. मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर हा पक्का बंधारा बांधण्यात येत आहे. साडेतीन किलाेमीटरपैकी अडीचशे मीटरचे काम शिल्लक आहे.पत्तन विभागाने केलेल्या सर्वेक्षणामधील सात धोकादायक क्षेत्रांपैकी हे एक क्षेत्र आहे. समुद्राचा प्रवाह बदलला असल्यामुळे या भागात उधाणाच्या लाटांचा मोठा मारा बसतो. त्यामुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन हे पाणी मानवी वस्तीत येण्याचा धोका निर्माण झाला आहे. पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतच्या टप्प्याचे काम करताना लागणाऱ्या यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेवरून वाद होता. जागा मालकाने याला विरोध केल्यामुळे काम रखडले होते. परंतु, त्याने आता संमती दिली असली तरी समुद्राला उधाण असल्याने बंधाऱ्याचे तळातून खोदकाम करून काम करणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतरच हे काम होण्याची शक्यता दिसत आहे.त्यामुळे पावसाळ्यातील संकटाचा सामना कसा करायचा, या भीतीच्या छायेखाली असलेल्या मिऱ्यावासीयांनी मंगळवारी पत्तन विभागाचे अधिकारी साळुंखे यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी साळुंखे यांनी संबंधित ठेकेदार आणि सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढण्याचे आश्वासन या ग्रामस्थांना दिले. यावेळी मिऱ्या गावातील ग्रामस्थ सुनील कांबळे, नागेश कांबळे, राजू भाटकर, छोट्या भाटकर, बाबू कांबळे, मनोज पानगले, अनिल पानगले, विजय तळेकर, मुरलीधर पन्हळेकर, दत्तगुरू कीर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणRainपाऊस