शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच आणणार, मंत्री नारायण राणे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 12:42 IST

व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे घेणार

चिपळूण : रिफायनरी होऊ देणार नाही म्हणणाऱ्यांची ताकद किती आहे, ती रोजच्या रोज आवळत चालली आहे. त्यामुळे त्यांनी सारखी चिव-चिव करू नये. हा प्रकल्प राबवल्याने जिल्ह्यातील लोकांचेच हित होणार आहे. येथील जनतेला मोठा रोजगार मिळणार आहे, लोकांचे दरडोई उत्पन्न वाढल्यास जिल्ह्याच्या विकासाला तसेच देशाच्या अर्थकारणालाही चालना मिळणार आहे. बेकारी दूर करण्याच्या प्रक्रियेत विरोधकांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.खेड तालुक्यातील लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माउली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान गो-शाळेतर्फे ज्येष्ठ गोभक्त, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप पुणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दि. २६ ते २८ जानेवारीदरम्यान राष्ट्रीय गो-संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाच्या समारोपासाठी मंत्री नारायण राणे उपस्थित हाेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मंत्री राणे यांनी सांगितले की, कोकणात अनेक शिकलेल्या तरुणांना नोकऱ्या हव्या आहेत. रिफायनरीच्या माध्यमातून तो पर्याय उपलब्ध होणार आहे. रिफायनरीसाठी पूरक असलेले अनेक मोठे उद्योगही येथे सुरू होणार आहेत. त्यामध्येही जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा कायापालट होईल.व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे घेणारजिल्ह्यातील तरुणांनी विविध व्यवसाय सुरू करावेत. यासाठी येत्या काही दिवसांत लघू, मध्यम व अवजड उद्योग मंत्रालयातर्फे प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार आहे. या शिबिरात तरुणांना व्यवसायसंबंधी प्रशिक्षण दिले जाईल. त्यातून विविध उद्योग सुरू होण्यास चालना मिळेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

आरक्षणावर आज बोलणारमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र, कोकणातील मराठा समाजात आरक्षणाच्या मागणीवरून दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. याविषयी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना विचारले असता उद्या, सोमवारी मुंबईत अधिकृतपणे भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पNarayan Raneनारायण राणे