शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच आणणार, मंत्री नारायण राणे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 12:42 IST

व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे घेणार

चिपळूण : रिफायनरी होऊ देणार नाही म्हणणाऱ्यांची ताकद किती आहे, ती रोजच्या रोज आवळत चालली आहे. त्यामुळे त्यांनी सारखी चिव-चिव करू नये. हा प्रकल्प राबवल्याने जिल्ह्यातील लोकांचेच हित होणार आहे. येथील जनतेला मोठा रोजगार मिळणार आहे, लोकांचे दरडोई उत्पन्न वाढल्यास जिल्ह्याच्या विकासाला तसेच देशाच्या अर्थकारणालाही चालना मिळणार आहे. बेकारी दूर करण्याच्या प्रक्रियेत विरोधकांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.खेड तालुक्यातील लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माउली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान गो-शाळेतर्फे ज्येष्ठ गोभक्त, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप पुणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दि. २६ ते २८ जानेवारीदरम्यान राष्ट्रीय गो-संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाच्या समारोपासाठी मंत्री नारायण राणे उपस्थित हाेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मंत्री राणे यांनी सांगितले की, कोकणात अनेक शिकलेल्या तरुणांना नोकऱ्या हव्या आहेत. रिफायनरीच्या माध्यमातून तो पर्याय उपलब्ध होणार आहे. रिफायनरीसाठी पूरक असलेले अनेक मोठे उद्योगही येथे सुरू होणार आहेत. त्यामध्येही जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा कायापालट होईल.व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे घेणारजिल्ह्यातील तरुणांनी विविध व्यवसाय सुरू करावेत. यासाठी येत्या काही दिवसांत लघू, मध्यम व अवजड उद्योग मंत्रालयातर्फे प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार आहे. या शिबिरात तरुणांना व्यवसायसंबंधी प्रशिक्षण दिले जाईल. त्यातून विविध उद्योग सुरू होण्यास चालना मिळेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

आरक्षणावर आज बोलणारमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र, कोकणातील मराठा समाजात आरक्षणाच्या मागणीवरून दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. याविषयी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना विचारले असता उद्या, सोमवारी मुंबईत अधिकृतपणे भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पNarayan Raneनारायण राणे