शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

उद्घाटनापूर्वीच रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचे पीओपी कोसळले

By अरुण आडिवरेकर | Updated: October 7, 2024 13:05 IST

रत्नागिरी : परतीच्या पावसाबरोबर आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने रत्नागिरी रेल्वेस्थानक सुशोभिकरण व नूतनीकरणाच्या कामाला रविवारी सायंकाळी जोरदार तडाखा दिला. सुदैवाने ...

रत्नागिरी : परतीच्या पावसाबरोबर आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने रत्नागिरीरेल्वेस्थानक सुशोभिकरण व नूतनीकरणाच्या कामाला रविवारी सायंकाळी जोरदार तडाखा दिला. सुदैवाने याठिकाणी कोणी प्रवासी नसल्याने कोणाला दुखापत झाली नाही. या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण दोन दिवसात होणार असून, त्याआधीच पीओपीचा काही भाग कोसळल्याचे समोर आले आहे.रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्यात आहे. रविवारी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली हाेती. या वादळी वाऱ्याचा सुशोभीकरणाच्या कामाला फटका बसला. छताला लावलेले पीओपीचे मोठे तुकडे वाऱ्याच्या वेगाबरोबर खाली लोंबकळून कोसळले. हे तुकडे खाली काेसळत असल्याचे पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते.प्रवाशांनी त्याठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. जेथे छताचा भाग कोसळत होता तो भाग प्रवाशांना ये-जा करण्यास अद्याप खुला करण्यात आलेला नाही. मात्र, या भागात प्रवाशांची काही प्रमाणा ये-जा सुरु हाेती. त्यामुळे या धोकादायक भागात कुणी जाणार नाही याची दक्षता रेल्वे प्रशासनाकडून घेतली जात होती.सुशाेभीकरण करण्यात आलेल्या रेल्वेस्थानकाचे दाेनच दिवसात लाेकार्पण हाेणार आहे. त्यापूर्वीच ही दुर्घटना घडल्याने कामाच्या दर्जाबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वे