शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

रत्नागिरी पोलिसांनी हरवलेले मोबाइल शोधून मालकांना केले परत

By अरुण आडिवरेकर | Updated: April 9, 2024 16:25 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध पाेलिस स्थानकांतर्गत सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत हरवलेले माेबाइल शाेधण्यात पाेलिसांना यश आले ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध पाेलिस स्थानकांतर्गत सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत हरवलेले माेबाइल शाेधण्यात पाेलिसांना यश आले आहे. हरवलेल्या तब्बल ४५ माेबाइलचा पाेलिसांनी शाेध घेतला. या माेबाइल मालकांचा शाेध घेऊन पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते ते परत करण्यात आले.सायबर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक अमित यादव, सहायक पोलिस निरीक्षक नितीन पुरळकर, महिला पोलिस हवालदार दुर्वा शेट्ये, तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलिस हवालदार रमिज शेख, पोलिस शिपाई नीलेश शेलार यांनी तसेच रत्नागिरी शहर, लांजा, चिपळूण, राजापूर, सावर्डे, देवरूख या पोलिस स्थानकांचे पोलिस अंमलदार यांनी एकत्रित काम करून प्राप्त माहितीच्या आधारे हरवलेल्या मोबाइलचा शोध घेतला.या प्रक्रियेमध्ये एकूण ४५ मोबाइलचा शोध लागला. त्यातील २७ माेबाइल त्यांच्या मालकांना धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक कार्यालय येथे परत देण्यात आले. उर्वरित माेबाइल सायबर पाेलिस स्थानकातून नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी सायबर क्राईमसारख्या गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीने तत्काळ जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधण्याबाबत धनंजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

कोणालाही ओटीपी शेअर करू नका, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग करू नका. तसेच आपले कोणतेही वैयक्तिक फोटो/व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर न करण्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. -धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस