शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मुंबईसह कोकणातील विधानसभेच्या ७० जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 19:05 IST

रत्नागिरीत महायुतीची समन्वय बैठक, भाजपा पदाधिकारी अनुपस्थित

रत्नागिरी : महायुतीने आत्तापासूनच विधानसभा निवडणुकीत एकजुटीने काम करायचे आहे. मुंबईसह कोकणातील विधानसभेच्या ७४ पैकी ७० जागा जिंकायचा निर्धार महायुतीने केला असल्याचे राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालयात रविवारी महायुतीच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई, आमदार प्रसाद लाड, आमदार अनिकेत तटकरे, गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, केदार साठे, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राहुल पंडित उपस्थित होते.मंत्री सामंत पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागा महायुतीने लढवायच्या आहेत. त्यामुळे भविष्यातील विधानसभेची निवडणूक होईपर्यंत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय व अन्य पक्षांचे नाव महायुती आहे. अशा प्रकारची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ मे रोजी झालेल्या महायुतीच्या बैठकीत मांडली आहे. लोकसभेला मुस्लिमांमध्ये तसेच गरीब बंधू-भगिनींमध्ये गैरसमज पसरविण्यात आल्यानेच उद्धवसेना आणि काँग्रेसला लोकसभेच्या जागा मिळाल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले की, आम्ही कोकणामध्ये खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. मात्र, आता या सर्वांनी एकत्र येऊन आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपण नक्की कोणाचे विरोधक आहोत आणि आपले विरोधक कोण आहेत, हे आपण भविष्यामध्ये समजून घेतले पाहिजे. या व्यासपीठावरील सर्व मंडळी हृदयापासून एकत्र आलो तर या कोकणातील ७० जागा जिंकून पुन्हा एकदा २०० जागांच्या पुढे जाऊन महायुतीचा झेंडा विधानसभेवर फडकवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या रॅलीचे नेतृत्व नारायण राणेंकडेबैठकीनंतर तीन-चार गोष्टींची चर्चा होऊ शकते. त्यामुळे महायुतीची बदनामी होणार आहे. खासदार नारायण राणे व्यासपीठावर नसल्याचा खुलासा मंत्री सामंत यांनी केला. ते म्हणाले की, नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री होते. म्हणून नियोजनाच्या बैठकीला न बोलावता २० तारखेला महायुतीच्या रॅलीचे नेतृत्व नारायण राणे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपा पदाधिकारी अनुपस्थितरत्नागिरीत झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीला भाजपाचे उत्तर व दक्षिण जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. मात्र, रत्नागिरीतील अन्य भाजपा पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती असल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांमध्येही शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक प्रमाणात हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024BJPभाजपा