शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह कोकणातील विधानसभेच्या ७० जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 19:05 IST

रत्नागिरीत महायुतीची समन्वय बैठक, भाजपा पदाधिकारी अनुपस्थित

रत्नागिरी : महायुतीने आत्तापासूनच विधानसभा निवडणुकीत एकजुटीने काम करायचे आहे. मुंबईसह कोकणातील विधानसभेच्या ७४ पैकी ७० जागा जिंकायचा निर्धार महायुतीने केला असल्याचे राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालयात रविवारी महायुतीच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई, आमदार प्रसाद लाड, आमदार अनिकेत तटकरे, गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, केदार साठे, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राहुल पंडित उपस्थित होते.मंत्री सामंत पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागा महायुतीने लढवायच्या आहेत. त्यामुळे भविष्यातील विधानसभेची निवडणूक होईपर्यंत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय व अन्य पक्षांचे नाव महायुती आहे. अशा प्रकारची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ मे रोजी झालेल्या महायुतीच्या बैठकीत मांडली आहे. लोकसभेला मुस्लिमांमध्ये तसेच गरीब बंधू-भगिनींमध्ये गैरसमज पसरविण्यात आल्यानेच उद्धवसेना आणि काँग्रेसला लोकसभेच्या जागा मिळाल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले की, आम्ही कोकणामध्ये खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. मात्र, आता या सर्वांनी एकत्र येऊन आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपण नक्की कोणाचे विरोधक आहोत आणि आपले विरोधक कोण आहेत, हे आपण भविष्यामध्ये समजून घेतले पाहिजे. या व्यासपीठावरील सर्व मंडळी हृदयापासून एकत्र आलो तर या कोकणातील ७० जागा जिंकून पुन्हा एकदा २०० जागांच्या पुढे जाऊन महायुतीचा झेंडा विधानसभेवर फडकवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या रॅलीचे नेतृत्व नारायण राणेंकडेबैठकीनंतर तीन-चार गोष्टींची चर्चा होऊ शकते. त्यामुळे महायुतीची बदनामी होणार आहे. खासदार नारायण राणे व्यासपीठावर नसल्याचा खुलासा मंत्री सामंत यांनी केला. ते म्हणाले की, नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री होते. म्हणून नियोजनाच्या बैठकीला न बोलावता २० तारखेला महायुतीच्या रॅलीचे नेतृत्व नारायण राणे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपा पदाधिकारी अनुपस्थितरत्नागिरीत झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीला भाजपाचे उत्तर व दक्षिण जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. मात्र, रत्नागिरीतील अन्य भाजपा पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती असल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांमध्येही शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक प्रमाणात हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024BJPभाजपा