शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 12:08 IST

९१ गावांमधील २२८ वाड्यांमध्ये टंचाई

रत्नागिरी : जिल्ह्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर पाणीटंचाईतून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा हाेती. मात्र, पुरेसा पाणीसाठा न झाल्याने आणि वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये अजून वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ९१ गावांमधील २२८ वाड्यांतील ५६,६७० ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. टंचाईग्रस्त भागात केवळ २४ टँकरने दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ६१ गावांमधील १५८ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत हाेती. मात्र, दुसऱ्याच आठवड्यामध्ये टंचाईची भीषणता वाढल्याने ही संख्या २२८ वाड्यांवर गेली आहे. प्रत्येक दिवशी टंचाईग्रस्त वाड्यांची भर पडत असल्याने प्रशासनालाही पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना कसरत करावी लागत आहे.

तापमानात प्रचंड वाढ झाल्याने नद्या, नाल्यांसह विहिरी, विंधन विहिरीतील पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी, ग्रामस्थांना टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्यासाठी ४ शासकीय आणि २० खासगी टँकर धावत आहेत. शासनाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठाही अपुरा असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. अनेक वाड्यांमध्ये विकतचे पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

टंचाईग्रस्त गावे, वाड्यातालुका -गावे वाड्या - टँकरमंडणगड - १ - १ - १दापाेली - १२ - १६ - १खेड - १५ - ४२ - १चिपळूण - १६ - ३५ - १गुहागर - २ - ३ - १संगमेश्वर - १९ - ३२ - १रत्नागिरी - १३ - ८२ - १३लांजा - ४ - ६ - १राजापूर - ९ - ११ - ३

टंचाईग्रस्त गावेलांजा- पालू, हर्दखळे, कोचरी, कुरंग

चिपळूण- कोंडमळा, कादवड, कळकवणे, सावर्डे, नादखेरकी, करंबवणे, कुडूप, टेरव, अडरे, आगवे, अनारी, डेरवण, डेरवण खुर्द, पेढांबे, गुढे.खेड- देवसडे, दिवाणखवटी, फुरुस, कुळवंडी, तळे, तुळशी बुद्रूक खु, चिंचवली, घेरारसाळगड, खवटी, आस्तान, चाटव, कशेडी, सवणस, चिरणी खोपी कळंबणी बु.

दापोली- उटंबर, आतगाव, केळशी, ओणनवसे, तामसतीर्थ, उन्हवरे, आडे, पणदेरी, कुडावळे, पांगारी तर्फ हवेली, आंजर्ले, महामाईनगर.संगमेश्वर- पाचांबे, काटवली, ओझरखोल, कुटगिरी, विघ्रवली, कोंडओझरे, शेनवडे, बेलारे खुर्द, कोळंबे, वायंगणे, मासरंग, तळवडे तर्फ देवरुख, मुचरी, निवे खुर्द, निवळी, असुर्डे, मिरकोंड, साखळकोंड, पेढांबे.

मंडणगड- भोळवली.राजापूर- ओणी, ओझर, वडवली, वडदहसोळ, दोनिवडे, कोंड्ये, सौंदळ, तळगाव, देवाचे गोठणे, प्रिंदावण.

गुहागर- धोपावे, सडेजांभारी.रत्नागिरी- शिरगाव, भाट्ये, नाचणे, सडामिऱ्या, केळ्ये, सोमेश्वर, गोळव, उक्षी, कळझोंडी, खेडशी, वरवडे, जांभारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीdroughtदुष्काळ