शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 12:08 IST

९१ गावांमधील २२८ वाड्यांमध्ये टंचाई

रत्नागिरी : जिल्ह्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर पाणीटंचाईतून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा हाेती. मात्र, पुरेसा पाणीसाठा न झाल्याने आणि वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये अजून वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ९१ गावांमधील २२८ वाड्यांतील ५६,६७० ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. टंचाईग्रस्त भागात केवळ २४ टँकरने दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ६१ गावांमधील १५८ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत हाेती. मात्र, दुसऱ्याच आठवड्यामध्ये टंचाईची भीषणता वाढल्याने ही संख्या २२८ वाड्यांवर गेली आहे. प्रत्येक दिवशी टंचाईग्रस्त वाड्यांची भर पडत असल्याने प्रशासनालाही पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना कसरत करावी लागत आहे.

तापमानात प्रचंड वाढ झाल्याने नद्या, नाल्यांसह विहिरी, विंधन विहिरीतील पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी, ग्रामस्थांना टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्यासाठी ४ शासकीय आणि २० खासगी टँकर धावत आहेत. शासनाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठाही अपुरा असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. अनेक वाड्यांमध्ये विकतचे पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

टंचाईग्रस्त गावे, वाड्यातालुका -गावे वाड्या - टँकरमंडणगड - १ - १ - १दापाेली - १२ - १६ - १खेड - १५ - ४२ - १चिपळूण - १६ - ३५ - १गुहागर - २ - ३ - १संगमेश्वर - १९ - ३२ - १रत्नागिरी - १३ - ८२ - १३लांजा - ४ - ६ - १राजापूर - ९ - ११ - ३

टंचाईग्रस्त गावेलांजा- पालू, हर्दखळे, कोचरी, कुरंग

चिपळूण- कोंडमळा, कादवड, कळकवणे, सावर्डे, नादखेरकी, करंबवणे, कुडूप, टेरव, अडरे, आगवे, अनारी, डेरवण, डेरवण खुर्द, पेढांबे, गुढे.खेड- देवसडे, दिवाणखवटी, फुरुस, कुळवंडी, तळे, तुळशी बुद्रूक खु, चिंचवली, घेरारसाळगड, खवटी, आस्तान, चाटव, कशेडी, सवणस, चिरणी खोपी कळंबणी बु.

दापोली- उटंबर, आतगाव, केळशी, ओणनवसे, तामसतीर्थ, उन्हवरे, आडे, पणदेरी, कुडावळे, पांगारी तर्फ हवेली, आंजर्ले, महामाईनगर.संगमेश्वर- पाचांबे, काटवली, ओझरखोल, कुटगिरी, विघ्रवली, कोंडओझरे, शेनवडे, बेलारे खुर्द, कोळंबे, वायंगणे, मासरंग, तळवडे तर्फ देवरुख, मुचरी, निवे खुर्द, निवळी, असुर्डे, मिरकोंड, साखळकोंड, पेढांबे.

मंडणगड- भोळवली.राजापूर- ओणी, ओझर, वडवली, वडदहसोळ, दोनिवडे, कोंड्ये, सौंदळ, तळगाव, देवाचे गोठणे, प्रिंदावण.

गुहागर- धोपावे, सडेजांभारी.रत्नागिरी- शिरगाव, भाट्ये, नाचणे, सडामिऱ्या, केळ्ये, सोमेश्वर, गोळव, उक्षी, कळझोंडी, खेडशी, वरवडे, जांभारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीdroughtदुष्काळ