शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 12:08 IST

९१ गावांमधील २२८ वाड्यांमध्ये टंचाई

रत्नागिरी : जिल्ह्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर पाणीटंचाईतून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा हाेती. मात्र, पुरेसा पाणीसाठा न झाल्याने आणि वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये अजून वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ९१ गावांमधील २२८ वाड्यांतील ५६,६७० ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. टंचाईग्रस्त भागात केवळ २४ टँकरने दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ६१ गावांमधील १५८ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत हाेती. मात्र, दुसऱ्याच आठवड्यामध्ये टंचाईची भीषणता वाढल्याने ही संख्या २२८ वाड्यांवर गेली आहे. प्रत्येक दिवशी टंचाईग्रस्त वाड्यांची भर पडत असल्याने प्रशासनालाही पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना कसरत करावी लागत आहे.

तापमानात प्रचंड वाढ झाल्याने नद्या, नाल्यांसह विहिरी, विंधन विहिरीतील पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी, ग्रामस्थांना टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्यासाठी ४ शासकीय आणि २० खासगी टँकर धावत आहेत. शासनाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठाही अपुरा असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. अनेक वाड्यांमध्ये विकतचे पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

टंचाईग्रस्त गावे, वाड्यातालुका -गावे वाड्या - टँकरमंडणगड - १ - १ - १दापाेली - १२ - १६ - १खेड - १५ - ४२ - १चिपळूण - १६ - ३५ - १गुहागर - २ - ३ - १संगमेश्वर - १९ - ३२ - १रत्नागिरी - १३ - ८२ - १३लांजा - ४ - ६ - १राजापूर - ९ - ११ - ३

टंचाईग्रस्त गावेलांजा- पालू, हर्दखळे, कोचरी, कुरंग

चिपळूण- कोंडमळा, कादवड, कळकवणे, सावर्डे, नादखेरकी, करंबवणे, कुडूप, टेरव, अडरे, आगवे, अनारी, डेरवण, डेरवण खुर्द, पेढांबे, गुढे.खेड- देवसडे, दिवाणखवटी, फुरुस, कुळवंडी, तळे, तुळशी बुद्रूक खु, चिंचवली, घेरारसाळगड, खवटी, आस्तान, चाटव, कशेडी, सवणस, चिरणी खोपी कळंबणी बु.

दापोली- उटंबर, आतगाव, केळशी, ओणनवसे, तामसतीर्थ, उन्हवरे, आडे, पणदेरी, कुडावळे, पांगारी तर्फ हवेली, आंजर्ले, महामाईनगर.संगमेश्वर- पाचांबे, काटवली, ओझरखोल, कुटगिरी, विघ्रवली, कोंडओझरे, शेनवडे, बेलारे खुर्द, कोळंबे, वायंगणे, मासरंग, तळवडे तर्फ देवरुख, मुचरी, निवे खुर्द, निवळी, असुर्डे, मिरकोंड, साखळकोंड, पेढांबे.

मंडणगड- भोळवली.राजापूर- ओणी, ओझर, वडवली, वडदहसोळ, दोनिवडे, कोंड्ये, सौंदळ, तळगाव, देवाचे गोठणे, प्रिंदावण.

गुहागर- धोपावे, सडेजांभारी.रत्नागिरी- शिरगाव, भाट्ये, नाचणे, सडामिऱ्या, केळ्ये, सोमेश्वर, गोळव, उक्षी, कळझोंडी, खेडशी, वरवडे, जांभारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीdroughtदुष्काळ