शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
4
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
5
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
6
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
7
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
8
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
9
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
11
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
12
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
13
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
14
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
15
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
16
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
17
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला; आठवड्यानंतर सूर्य दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:50 IST

हवामान खात्याने ३१ मेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली

रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवार (दि. २७ मे) पर्यंत दिवसभर संततधार धरलेल्या पावसाने रात्री उशिरा विश्रांती घेण्यास सुरुवात केली. रात्रभर पाऊस थांबला होता. सकाळी आठवड्यानंतर काही काळ सूर्य दर्शनही झाले. त्यानंतर दिवसभर मात्र हलक्या सरी वगळता पावसाने उघडीप दिली होती. मंगळवारी सकाळपासून बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ३७.९६ मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.जिल्ह्यात २१ मेपासून पावसाने मुसळधार पडण्यास सुरुवात केली आहे. या मे महिन्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी वार्षिक सरासरीच्या १५ टक्के आहे. गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्यात पंधरा दिवस पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला. संपूर्ण रात्र पाऊस शांत होता. बुधवारी सकाळी काही काळ सूर्य दर्शन झाल्याने नागरिकांना हायसे वाटले. दिवसभरात हलक्या सरी वगळता पावसाचे उघडीप दिली होती.सायंकाळी जोरदार वारा सुटला होता. आभाळही अंधारून आल्याने पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाटत होती. मात्र, रात्रीपर्यंत पाऊस हलक्या सरींवर होता. दरम्यान जिल्ह्यात ३१ मेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस