शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रत्नागिरीतील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडले; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 11:57 IST

एकूण पाणीसाठ्यापैकी जवळपास ०.५३ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा वक्र दरवाजे अज्ञाताने उघडल्यामुळे वाहून गेले आहे.

खेड : तालुक्यातील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्यामुळे धरणातीलपाणीसाठ्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. या धरणाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही स्वरूपात व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे अज्ञाताला सहज हे कृत्य करणे शक्य झाले.मिळालेल्या माहितीनुसार, या धरणाचे दरवाजे उघडण्याच्या ठिकाणी असणारे कुलूप एक आठवड्यापूर्वी अज्ञाताने तोडले होते आणि अज्ञाताने धरणाचे दरवाजे अर्धवट उघडले होते. सध्या एका खासगी कंपनीकडून या धरणाच्या उघडलेल्या दरवाजाचे वेल्डिंग करून ते बंद करण्याचे प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून केले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी कुणाल ढेरे यांनी दिली आहे.तळवट धरणाच्या बांधकामाची सुरुवात १९९५ मध्ये करण्यात आली होती. धरणाची २०१० मध्ये घळभरणी झाल्यानंतर त्यामध्ये आता ४.५४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होतो. एकूण पाणीसाठ्यापैकी जवळपास ०.५३ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा वक्र दरवाजे अज्ञाताने उघडल्यामुळे वाहून गेले आहे.या प्रकरणी गेल्या आठवड्यात खेड पोलीस स्थानकामध्ये घडलेल्या प्रकाराबाबत लेखी पत्राद्वारे माहिती देण्यात आली होती. धरणाचे दरवाजे उघडणाऱ्या अज्ञातांचा शोध घेण्याचे पोलिसांना पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.सध्या धरणावर नव्याने कुलूप बसवण्यात आले असून, लवकरच धरणाचे दरवाजे बंद केले जातील, असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे; मात्र धरणासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकच नसल्याने धरणाची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचे  स्पष्ट झाले आहे. यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस या धरणाच्या काही सामानाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणWaterपाणी