शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ लवकरच महाराष्ट्रात, मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 13:53 IST

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत

गणपतीपुळे : मराठी भाषेचा जगभर प्रसार व्हावा, यासाठी मराठी भाषेला वाहिलेले देशातील पहिले विद्यापीठ लवकरच महाराष्ट्रात उभारण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरी पंचायत समिती शिक्षण विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, मालगुंड आणि कवी केशवसुत स्मारक, मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम रविवारी मालगुंड येथे कविवर्य केशवसुत स्मारकात झाला. त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, कोमसाप तथा भाषा विकास समितीच्या सदस्या नमिता कीर, कोमसापचे सल्लागार, मार्गदर्शक अरुण नेरुरकर, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, प्रदीप तथा बंड्या साळवी, पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत सावंत, कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसाप मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर, जिल्हा परिषद सदस्या साधना साळवी, मालगुंडचे सरपंच दीपक दुर्गवळी, पंचायत समिती सदस्य उत्तम मोरे, कोमसापचे जिल्हाध्यक्ष शशांक पाटील, युवाशक्ती जिल्हा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अरुण मोर्ये, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय पोकळे, गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील उपस्थित होते.सकाळच्या सत्रात मालगुंड ग्रामपंचायत कार्यालयापासून कवी केशवसुत स्मारकापर्यंत मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी नेण्यात आली. विविध आकर्षक वेशभुषा केलेले विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ यात उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री उदय सामंत यांनी कवी केशवसुत आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले.मराठी भाषेला अधिक चांगले दिवस आणण्यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. मराठी भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी, ती जगाच्या पाठीवर पोहाेचविण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठमहाराष्ट्रात करण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून, तेही त्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्रuniversityविद्यापीठUday Samantउदय सामंत