शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

रिफायनरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By मनोज मुळ्ये | Updated: August 9, 2024 18:33 IST

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात जे आंदोलन केले गेले, त्यातील राजकीय व सामाजिक गुन्हे मागे ...

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात जे आंदोलन केले गेले, त्यातील राजकीय व सामाजिक गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. असे नेमके किती गुन्हे आहेत, याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक लवकरच तयार करतील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी मंत्री सामंत यांनी बारसू तसेच नाणार येथील आंदोलकांचे नेते तसेच ग्रामस्थांसमवेत चर्चा केली. नाणारमध्ये होऊ घातलेल्या बॉक्साईट उत्खननाबाबत ही चर्चा होती. याचवेळी प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबतही चर्चा झाली. जोपर्यंत ग्रामस्थांशी चर्चा होत नाही, तोपर्यंत सरकार कोणताही प्रकल्प लादणार नाही, कसलीही बळजबरी केली जाणार नाही, अशी भूमिका मंत्री सामंत यांनी पुन्हा एकदा मांडली.बारसूमध्ये झालेल्या आंदाेलनानंतर अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यातील जे गुन्हे राजकीय व सामाजिक विषयांसाठीचे आहेत, ते गुन्हे मागे घेण्यात येतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. किती ग्रामस्थांवर, कोणत्या प्रकारचे, किती गुन्हे दाखल आहेत, याची माहिती काढण्याची सूचना आपण जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना केली आहे. त्यांचा अहवाल तयार झाल्यानंतर पुढील प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे ते म्हणाले.या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह रिफायनरी आंदोलकांचे नेते अशोक वालम, अमोल गोळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ हजर होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्पagitationआंदोलनUday Samantउदय सामंत