शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

ठाकरे सरकार निर्लज्ज, कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडलं, नितेश राणे संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 18:11 IST

Politics Nitesh Rane : तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या तुंटपूज्या मदतीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. कोकणात झालेल्या नुकसानी भरपाई घोषित केली पण नुकसानग्रस्तांना मिळालेली रक्कम अपूर्ण असल्याची तक्रार नितेश राणे यांनी केली आहे.

ठळक मुद्देठाकरे सरकार निर्लज्ज, कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडलंभाजपचे नेते नितेश राणे संतप्त, तुंटपूज्या मदतीवर साधला निशाणा

सिंधुदुर्ग : तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या तुंटपूज्या मदतीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. कोकणात झालेल्या नुकसानी भरपाई घोषित केली पण नुकसानग्रस्तांना मिळालेली रक्कम अपूर्ण असल्याची तक्रार नितेश राणे यांनी केली आहे.आमदार नितेश राणे म्हणाले की, तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी कोकण दौरा केला परंतु सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई "खोदा पहाड निकला चुहा" अशा प्रकारची नुकसान भरपाई आमच्या कोकणाला महाविकास आघाडी सरकारने दिलेली आहे .जिथे मच्छिमारांच लाखोंचं नुकसान झालेलं आहे, तिथे फक्त 50 हजार पर्यतची मदत केली.

हेक्टरी 50 हजार मदत देणार असल्याचे सरकारने सांगितले आहे, म्हणजे एका आंब्याच्या झाडाला 500 रुपये तर नारळाच्या झाडाला 250 रुपये , टपरीला 10 हजार रुपये , एवढे सगळे आकडे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा खर्च तरी एवढा आहे का ? जी काही कोकणाला मदत केली आहे. मग हे पंचनामे कशासाठी केले आमची आमची थट्टा करण्यासाठी की मजाक उडवण्यासाठी झाले.

एका बाजूला लाखोंची करोडोंची नुकसान झालेले आहे.निर्लज्जपणे केंद्राकडे दोन हजार कोटी मागायचे आणि इथे फक्त अडीच कोटी रुपये द्यायचे असं हे निर्लज्ज ठाकरे सरकार निर्लज्ज आहे. कोकणी माणसाला अक्षरशा वाऱ्यावर सोडले आहे, असेही राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टिका केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitesh Raneनीतेश राणे Ratnagiriरत्नागिरी