शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दहावी परीक्षा : पाठांतर करून पेपर लिहिण्याचा जमाना झाला आता कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 14:48 IST

परीक्षेपूर्वी पाठांतर करून पेपर लिहिण्याच्या पध्दतीमध्ये आता बदल करण्यात आला असून, यावर्षी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका दिली जाणार आहे. सध्या कृतिपत्रिका सोडविण्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला जात आहे. या कृतिपत्रिकेमध्ये अभ्यासक्रमातील संकल्पना वर्तमानातील चालू घडामोडींशी जोडून प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाकडे लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

ठळक मुद्देदहावी परीक्षा : पाठांतर करून पेपर लिहिण्याचा जमाना झाला आता कालबाह्य विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गरज

रत्नागिरी : परीक्षेपूर्वी पाठांतर करून पेपर लिहिण्याच्या पध्दतीमध्ये आता बदल करण्यात आला असून, यावर्षी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका दिली जाणार आहे. सध्या कृतिपत्रिका सोडविण्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला जात आहे. या कृतिपत्रिकेमध्ये अभ्यासक्रमातील संकल्पना वर्तमानातील चालू घडामोडींशी जोडून प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाकडे लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.चालू शैक्षणिक वर्ष (२०१८-१९) मध्ये दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, परीक्षा पध्दतीमध्येही बदल करण्यात आला आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेबरोबर विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल अशा सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांऐवजी आता कृतिपत्रिका विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यानुसार अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, बालभारतीने तशा पध्दतीने कृतिपत्रिका व व्हिडिओ तयार करून महामंडळाच्या संकेतस्थळावर लोड केले आहेत.पहिल्या टप्प्यात सर्व विषयांच्या एकूण ७६ लाख ८६ हजार ३ प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यात आल्या होत्या. सराव प्रश्नसंच प्रसिध्द झाल्यानंतर काही दिवसांनी त्या विषयाची संक्षिप्त उत्तर पत्रिकादेखील बालभारतीच्या संकेतस्थाळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यातीलही कृतिपत्रिका डाऊनलोड करण्यास प्रारंभ झाला आहे. विद्यार्थीवर्ग सध्या या कृतिपत्रिकेव्दारे सराव करीत आहेत.दहावीच्या विज्ञान विषयाचा अभ्यास विस्तारीत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक भर द्यावा लागणार आहे. दैनंदिन व्यवहारातील काही उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांसाठी प्रश्न तयार केले आहेत. भाषेच्या कृतिपत्रिका विद्यार्थ्यांना सहज सोडविणे शक्य आहे. तोंडी परीक्षेचे भाषेतील वीस गुण कमी झाले असले तरी नवीन बदलानुसार अभिव्यक्ती, भावार्थ, व्याकरण असे ७० गुण विद्यार्थ्यांना मिळविणे शक्य आहे. परंतु त्यासाठी विचारक्षमतेचा कस लावावा लागणार आहे.कृतिपत्रिका सोडविण्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना तीन तास अपुरे पडत आहेत. बातमी लेखन, उतारे, सारांश लेखन, निबंध, कथालेखन, कवितांचे रसविचार लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना अवधी लागत आहे. दहावीच्या प्रत्येक पुस्तकातील धड्यांच्या खाली क्युआर कोड दिला आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर त्या विषयाबाबतची अधिकची माहिती उपलब्ध होत आहे.प्रश्नोत्तरामध्ये लघु, दीर्घ उत्तरे यांचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. भाषेत उतारे वाचून प्रश्नांची उत्तरे लिहावी लागणार आहेत. विज्ञान विषयात कृतिपत्रिकेचे निरीक्षण करून उत्तरे लिहावी लागणार आहेत. इतिहासामध्ये युरोपातील विचारवंत, ऐतिहासिक वास्तूबाबत संकल्पचित्र पूर्ण करणे, नागरिकशास्त्रात निवडणूक प्रक्रिया कशी पूर्ण केली जाते याचा तक्ता, तर भूगोल विषयात भारत व ब्राझीलच्या पर्जन्यकाळामधील फरक विचारणारे प्रश्न आहेत. यापूर्वी विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे प्रत्येक विषयासाठी २० गुण होते. मात्र, विज्ञान विषय सोडून सर्व विषयांच्या तोंडी परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत.पाठ्यपुस्तक मंडळाने एक संपूर्ण मार्गदर्शनपर व्हिडिओ बालभारतीच्या संकेतस्थळावर व युट्युबवर डाऊनलोड केला होता. विविध विषयांतील तज्ज्ञांचे व्हिडिओ असून, त्याव्दारे त्या-त्या विषयासंबंधी विद्यार्थ्यांना ज्ञार्नार्जन होत आहे. क्लिष्ट वाटणारे प्रश्न व त्याबाबतची माहिती मिळण्यास मदत होत आहे. 

पहिल्या टप्प्यात सर्व विषयांचे सराव प्रश्नसंच प्रसिध्द झाल्यानंतर काही दिवसांनी त्या विषयाची संक्षिप्त उत्तर पत्रिकादेखील बालभारतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील सराव प्रश्नसंच डाऊनलोड करण्यात आले आहेत. त्याव्दारे सध्या विद्यार्थ्यांनी सरावाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या प्रश्नसंच सोडविण्यासाठी नियोजित वेळ अपुरा ठरत असला तरी सरावाने विद्यार्थी पेपर वेळेत पूर्ण करतील.- के. बी. रूग्गे, मुख्याध्यापक,न्यू इंग्लिश स्कूल, नेवरे.

टॅग्स :examपरीक्षाRatnagiriरत्नागिरी