शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

काम न करणाऱ्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवा : प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 12:26 IST

रत्नागिरी : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडून देऊनही काहीही काम केलेले नाही, अशांना आपल्याला येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवायचा ...

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडून देऊनही काहीही काम केलेले नाही, अशांना आपल्याला येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवायचा आहे. त्यासाठी आम्हा सर्वांची एकी महत्त्वाची आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी आपल्याला त्रास दिला आहे, आता त्यांना धडा शिकवायचा आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे क्लस्टर प्रमुख आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.भाजपच्या दक्षिण रत्नागिरीतर्फे रविवारी शहरातील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात भाजप कार्यकर्ता संमेलनाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या संमेलनात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी शिंदे गट आणि अजित पवार गट यांना बरोबर घेऊन जायचे आहे, असे स्पष्ट केले. या लोकसभा मतदारसंघाचा विकास करावयाचा असेल तर मोदींनी दिलेले प्रकल्प, योेजना येथे राबवायला पाहिजेत. ते कोणी राबविले नाहीत, या विकासाच्या आड कोण आले, हे लोकांसमोर सांगायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

मोदींनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघाला प्रकल्प दिलेला आहे. मोदी देत असतानाही येथील खासदाराने काय काम केले. प्रकल्प का आणला नाही, अशी त्यांना विचारणा करा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. काँग्रेसने केवळ पाट्या लावण्याचे काम केले. मात्र, मोदींनी पाट्याही लावल्या आणि त्या प्रत्येक प्रकल्पाचे उद्घाटनही केले, असेही ते म्हणाले.यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार बाळ माने, प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, ॲड. बाबासाहेब परुळेकर, बाळासाहेब पाटील, सतीश शेवडे, राजन फाळके व अन्य पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.घाेटाळ्यावर बाेलताना भीती

काँग्रेसने सर्वच बाबतीत घोटाळा केलेला आहे. मात्र, त्या घोटाळ्यांवर बोलताना भीती वाटते. कारण त्यापैकी बरेचजण आपल्याकडे आलेले आहेत, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले...तेव्हाच महामार्ग पूर्ण हाेणारमुंबई-गाेवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा मुख्यमंत्री प्रमाेद सावंत यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. ते म्हणाले की, आपला खासदार आल्यानंतरच मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPramod Sawantप्रमोद सावंतElectionनिवडणूकhighwayमहामार्ग