शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करजुवेत टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 2:46 PM

संंगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तातडीने दोन टँकर करजुवे गावात पोहोचल्याने येथील अकरा वाड्यांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.

ठळक मुद्देग्रामस्थांची गैरसोय दूर -- स्रोत आटल्याने तीव्र पाणीटंचाई- अकरा वाड्यांमध्ये ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल

देवरूख : संंगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तातडीने दोन टँकर करजुवे गावात पोहोचल्याने येथील अकरा वाड्यांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.मे महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश गावांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावामध्येही सध्या पाण्याचे स्रोत आटल्याने पाणी समस्या भेडसावू लागली आहे. उन्हामुळे पाण्याची पातळी अतिशय खाली गेली आहे. त्यामुळे गावातील लोकांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत होता.  या गावातील चाफेवाडी, मोरेवाडी, वाकसालवाडी, चांदिवडेवाडी, मावळातली बाचीमवाडी, भोईवाडी, तिसंगवाडी, डावलवाडी, बौद्धवाडी, सुतारवाडी, विचारेकोंड या ११ वाड्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने संगमेश्वरचे तहसीलदार संदीप कदम यांच्याकडे सादर केला होता.काही दिवसांपूर्वीच या गावाच्या दौºयावर आलेले रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या गावात दोन टँकर पोहोचले. या टँकरने चाफेवाडी, मोरेवाडी, चांदिवडेवाडी, बाचिमवाडी या वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला.  यावेळी संगमेश्वरचे पंचायत समिती सदस्य सुभाष नलावडे, माजी उपसभापती संतोष डावल, करजुवेचे सरपंच शामसुंदर माने, उपसरपंच श्रीकांत नलावडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. गावासाठी दोन टँकर मिळाल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, देवरूख तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी धन्यवाद दिले. 

टॅग्स :water transportजलवाहतूकRatnagiriरत्नागिरी