शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

मोठाच बॉम्ब फोडला; सुनील तटकरेच भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 14:10 IST

भाजपच्या गळाला लागतील असे एक-दोनजण वगळता जिल्ह्यात बडे मासे आहेतच कुठे? भाजपमध्ये यायला अनेकजण इच्छुक आहेत. एवढेच काय तटकरेच भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र, तटकरे कोण हे लवकरच कळेल, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरी नगर वाचनालय येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी लाड हे जिल्हा दौऱ्यावर आहेत.

ठळक मुद्देतटकरेच भाजपच्या संपर्कात, प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोटकोण तटकरे हे लवकरच कळेल, जिल्ह्यात बडे मासे आहेतच कुठे

रत्नागिरी : भाजपच्या गळाला लागतील असे एक-दोनजण वगळता जिल्ह्यात बडे मासे आहेतच कुठे? भाजपमध्ये यायला अनेकजण इच्छुक आहेत. एवढेच काय तटकरेच भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र, तटकरे कोण हे लवकरच कळेल, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरी नगर वाचनालय येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी लाड हे जिल्हा दौऱ्यावर आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील कोणते बडे मासे भाजपच्या गळाला लागले आहेत, असा सवाल पत्रकारांनी केला असता लाड म्हणाले, जिल्ह्यात एक दोनजणच बडे मासे आहेत. ते संपर्कात आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आता बुडते जहाज बनले आहे. त्यामुळे हे जहाज बुडायच्या आधी ते वाचण्यासाठी अनेकांनी पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिल्ह्यात भाजपची स्थिती आता भक्कम आहे, असे ते म्हणाले.राज्यात विधानसभेला युती झाली नाही तर तुम्ही रत्नागिरीतून लढणार का, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्यावर आपण असे झाल्यास रत्नागिरीतून निवडणूक नक्की लढवू, असेही सांगितले होते.

रत्नागिरीतच काय परंतु रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ताकद आता वाढली आहे. त्यामुळे तेथे भाजपचा कोणताही कार्यकर्ता युती झाली नाही तर निवडणूक लढवून विजयी होऊ शकतो, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र, हा जर-तरचा विषय आहे. परंतु, राज्यात शिवसेना व भाजपची युती होणार व फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार हे शंभर टक्के सत्य असल्याचे लाड म्हणाले.रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त स्थितीची पाहणी करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी निदर्शनाला आल्याचे लाड म्हणाले. संगमेश्वरसह अन्य भागांमध्येही अनेक ठिकाणी नद्या व अन्य जलस्रोत आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे.

लोकसहभागातून हा गाळ काढणे शक्य आहे. लोकांचीही त्यासाठी तयारी असल्याचे आपल्याला आढळून आले. त्यामुळे गाळउपसा आवश्यक असलेल्या नद्यांच्या परिसरातील गावांच्या समन्वयातून त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन लोकसहभाग घेतला जाणार आहे.राज्यात ७० हजार नव्हे तर ९० हजार पदांसाठी मेगाभरती होणार आहे. मध्यंतरी काही कायदेशीर बाबींमुळे हे मेगाभरती थांबली होती. मात्र, येत्या चार महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. शासकीय भरतीत कोकणातील उमेदवारांना १० ते १५ टक्केच स्थान मिळते याबाबत पत्रकारांनी विचारताच यापुढे होणाऱ्या भरतीत स्थानिक उमेदवारांना ८० टक्के प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे लाड यांनी यावेळी सांगितले.राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीसचआगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे असतील की शिवसेनेचे यावरून जोरदार कलगी-तुरा सुरू आहे. त्यामुळे नक्की मुख्यमंत्री कोण होणार, असा सवाल पत्रकारांनी केला असता लाड म्हणाले, देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री असतील. त्याबाबत कोणीही संशय ठेवू नये.

मुख्यमंत्रीपद हे भाजपकडेच राहील. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाल्याप्रमाणे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद येऊ शकेल. मात्र, हे वरिष्ठ स्तरावरील विषय आहेत, असे आमदार प्रसाद लाड म्हणाले. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेPrasad Ladप्रसाद लाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा