शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

रत्नागिरीतील एका व्हीलचेअरवरच्या लग्नाची गोष्ट...!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 6:16 PM

रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांची दोन वर्षांपूर्वी एका मेळाव्यात योगेश खाडे (शिरोळ) या दिव्यांग तरूणाशी ओळख झाली.

- मेहरून नाकाडे रत्नागिरी : सनईचे सूर निनादत असतानाच, करवल्यांची मंडपात एकच घाई झाली होती. एवढ्यात मुहूर्ताची वेळ झाल्यावर मंगलाष्टका सुरू केल्या. अक्षता टाकण्यासाठी नवेट गावातील सहदेव एरीम यांच्या मंडपात सर्व धर्मियातील बंधू-भगिनींची गर्दी केली होती. हा विवाह विशेष होता. कारण दोन दिव्यांगांची मने जुळून आली होती अन् मैत्रीचं रुपांतर लग्नबंधनात झाले होते. या आनंद सोहळ्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सुवर्णा व योगेश या दोन दिव्यांग उभयतांचं हे लग्न पाहण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी गर्दी केली होती.

रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांची दोन वर्षांपूर्वी एका मेळाव्यात योगेश खाडे (शिरोळ) या दिव्यांग तरूणाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनचे सदस्यपद योगेशने स्वीकारले होते, तर सुवर्णा एरीम ही संस्थेची पूर्वीपासून सदस्या होती. पॅराप्लेजिकल संघटनेच्या मेळाव्यासाठी योगेश कोल्हापूरहून रत्नागिरीत आला होता. मेळाव्याचे सूत्रसंचालन सुवर्णाने केले, त्यामुळे मेळाव्यानंतर ओळख झाली. सुवर्णा ही पोलिओग्रस्त आहे तर योगेश पॅराप्लेजिकल आहे. योगेश स्वत: छायाचित्रकार असून, घराजवळच स्टुडिओ आहे. योगेश व सुवर्णाची पुढे चांगली मैत्री झाली.

योगेशने  सुवर्णाबरोबर लग्न करायचे असल्याचे सादिकभार्इंना सांगितले. योगेशच्या घरची मंडळी तयार होती, प्रश्न होता सुवर्णाच्या घरच्या मंडळींचा. परंतु दोघांचे विचार जुळले असल्याने शिवाय रितसर खाडे कुटुंबियांकडून मागणी असल्याने एरिम कुटुंबियांनीही परवानगी दिली. सादीकभाई यांच्या  पुढाकाराने लग्न ठरले. सुवर्णाच्या घरीच लग्न असल्याने तयारीही जोरदार करण्यात आली होती.

शिरोळहून खाडे कुटुंबीय नातेवाईकांसह एक दिवस आधीच नवेट गावी दाखल झाले. शनिवारी साखरपुडा व रविवारी दुपारी ३.१८ मिनिटांनी देवाब्राह्मणाच्या साक्षीने लग्न लागले. व्हिलचेअरवर बसून  उभयतांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. दोन धडपड्या जीवांचं शुभमंगल अनेकांना आयुष्यात उभं राहण्याचं धडा देऊन गेलं.

नयनी आले आनंदाश्रूसुवर्णा,योगेश या उभयतांना भरभरून आशीर्वाद दिले. रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनकडेच यजमानपद असल्याने पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. केवळ उपस्थित न राहिता लग्नाच्या तयारीत त्यांनी हातभारही लावला होता. हा विवाह जुळून येण्यापासून ते तो पार पडेपर्यंत साऱ्याच घटनांना संस्थेचा स्पर्श झाला. मात्र मैत्रीची कहाणी प्रेमात बदलल्याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर तरळला होता.

टॅग्स :marriageलग्न