शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

महामार्गावर हाड वैद्याचा नवा उद्योग सुरू करा, आदित्य ठाकरेंचा उद्योगमंत्र्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 16:51 IST

ठाकरे सरकारने कठीण काळातही राज्यातील सामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सुमारे ८० हजार तरुणांना रोजगार मिळवून दिला.

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मानेचा पट्टा लावूनच प्रवास करायला हवा. उद्योगमंत्र्यांना सुचवावेसे वाटते की, अन्य उद्योग सुरू करण्यापेक्षा महामार्गावर हाड वैद्य, लेप वैद्य व मानेचा पट्टा विकणाऱ्यांचा नवा उद्योग सुरू करावा, असा सल्ला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चिपळुणातील सभेत दिला.

शिवसेनेतर्फे सुरू असलेल्या शिव संवाद निष्ठा यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांची चिपळुणातील ओझरवाडी येथील शिवसेना शहरप्रमुखांच्या कार्यालयासमोर जाहीर सभा झाली. यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव, उपनेते राजन साळवी, आमदार वैभव नाईक, ॲड. अनिल परब, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाळा कदम, शहरप्रमुख उमेश सकपाळ उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, कोकणातील महामार्गाची परिस्थिती वर्षानुवर्षे कायम असून, ती आता बदलली पाहिजे. ठाकरे सरकारने कठीण काळातही राज्यातील सामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सुमारे ८० हजार तरुणांना रोजगार मिळवून दिला. महिलांसाठी वेगवेगळे आपण काही गोष्टी आणत होतो. गेल्या अडीच वर्षांमध्ये साधारण साडेसहा लाख कोटी एवढी गुंतवणूक आणली. हिंमत असेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत आणि निवडणुकीला सामोरे जावे. मीही शिवसेनेतून एकटा राजीनामा देतो आणि वरळीतून पुन्हा विजय मिळवून दाखवतो, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.

माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा उल्लेख न करताच त्यांच्यावर टीका करताना म्हणाले, हॅपकिन हा मोठा वैज्ञानिक होता. त्यांच्या नावाने मोठी संस्था आहे. परंतु, आपल्या आरोग्यमंत्र्यांना तो दलाल वाटतो. नशीब त्यांना खेकडा वाटला नाही. नाहीतर खेकडा वाटला असता तर इथल्या धरणावर आले असते. इथल्या धरणाची अजून खोलवर चौकशी केली असती तर खेकडेच काय आणखी काय काय बाहेर आले असते, असा टोलाही लगावला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंत