शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महामार्गावर हाड वैद्याचा नवा उद्योग सुरू करा, आदित्य ठाकरेंचा उद्योगमंत्र्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 16:51 IST

ठाकरे सरकारने कठीण काळातही राज्यातील सामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सुमारे ८० हजार तरुणांना रोजगार मिळवून दिला.

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मानेचा पट्टा लावूनच प्रवास करायला हवा. उद्योगमंत्र्यांना सुचवावेसे वाटते की, अन्य उद्योग सुरू करण्यापेक्षा महामार्गावर हाड वैद्य, लेप वैद्य व मानेचा पट्टा विकणाऱ्यांचा नवा उद्योग सुरू करावा, असा सल्ला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चिपळुणातील सभेत दिला.

शिवसेनेतर्फे सुरू असलेल्या शिव संवाद निष्ठा यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांची चिपळुणातील ओझरवाडी येथील शिवसेना शहरप्रमुखांच्या कार्यालयासमोर जाहीर सभा झाली. यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव, उपनेते राजन साळवी, आमदार वैभव नाईक, ॲड. अनिल परब, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाळा कदम, शहरप्रमुख उमेश सकपाळ उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, कोकणातील महामार्गाची परिस्थिती वर्षानुवर्षे कायम असून, ती आता बदलली पाहिजे. ठाकरे सरकारने कठीण काळातही राज्यातील सामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सुमारे ८० हजार तरुणांना रोजगार मिळवून दिला. महिलांसाठी वेगवेगळे आपण काही गोष्टी आणत होतो. गेल्या अडीच वर्षांमध्ये साधारण साडेसहा लाख कोटी एवढी गुंतवणूक आणली. हिंमत असेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत आणि निवडणुकीला सामोरे जावे. मीही शिवसेनेतून एकटा राजीनामा देतो आणि वरळीतून पुन्हा विजय मिळवून दाखवतो, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.

माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा उल्लेख न करताच त्यांच्यावर टीका करताना म्हणाले, हॅपकिन हा मोठा वैज्ञानिक होता. त्यांच्या नावाने मोठी संस्था आहे. परंतु, आपल्या आरोग्यमंत्र्यांना तो दलाल वाटतो. नशीब त्यांना खेकडा वाटला नाही. नाहीतर खेकडा वाटला असता तर इथल्या धरणावर आले असते. इथल्या धरणाची अजून खोलवर चौकशी केली असती तर खेकडेच काय आणखी काय काय बाहेर आले असते, असा टोलाही लगावला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंत