शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

रत्नागिरी-नागपूर महामार्ग रुंदीकरणाला गती, चौपदरीकरणातील बांधकामे हटविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:41 IST

रत्नागिरी : मिऱ्या- रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जागेत असलेली ८ बांधकामे तालुका प्रशासनाकडून सोमवारी हटविण्यात आली. ही ...

रत्नागिरी : मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जागेत असलेली ८ बांधकामे तालुका प्रशासनाकडून सोमवारी हटविण्यात आली. ही बांधकामे असलेल्या जागेचा मोबदला प्रशासनाकडून आधीच देण्यात आला होता. मात्र, तरीही त्यावरील ताबा न सोडल्याने ही बांधकामे पोलिस संरक्षणात हटविण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले आहे.मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. हा महामार्ग शहरानजीकच्या मिऱ्या येथून सुरू होत आहे. याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. यात रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांतील २९ गावांचा समावेश आहे. या महामार्गाच्या भूसंपादनाची जबाबदारी रत्नागिरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे देण्यात आली आहे. रत्नागिरीतील समावेश असलेल्या जमीनदारांना या जागेचा मोबदला देण्यात आला आहे. त्यानंतर या जमीनमालकांना जागेचा ताबा सोडण्याबाबत वारंवार नोटीसही पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, काहींनी अजूनही जमिनीचा ताबा सोडलेला नाही.

पावसाळ्यानंतर या महामार्गाचे काम द्रूतगतीने सुरू झाले आहे. त्यामुळे या घरांचा अडसर या कामाला होणार होता. शहरातील उद्यमनगर येथील झाडगाव ते कारवांची वाडी यादरम्यान अशी १५ बांधकामे आहेत. महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असल्याने ही बांधकामे तोडणे गरजेचे होते. मात्र, कल्पना देऊनही या जमीनमालकांनी या जमिनीचा अद्याप ताबा सोडलेला नव्हता.त्यामुळे सोमवारी यापैकी चंपक मैदान ते साळवी स्टाॅप यादरम्यानची ८ बांधकामे पोलिस संरक्षणात हटविण्यात आली. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थितीत होते. उर्वरित ७ बांधकामे मंगळवारी हटविण्यात येणार असल्याचे तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले.ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, भूसंपादन, भूमी अभिलेख आणि महसूल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. यावेळी या विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्ग