शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

रत्नागिरी-नागपूर महामार्ग रुंदीकरणाला गती, चौपदरीकरणातील बांधकामे हटविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:41 IST

रत्नागिरी : मिऱ्या- रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जागेत असलेली ८ बांधकामे तालुका प्रशासनाकडून सोमवारी हटविण्यात आली. ही ...

रत्नागिरी : मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जागेत असलेली ८ बांधकामे तालुका प्रशासनाकडून सोमवारी हटविण्यात आली. ही बांधकामे असलेल्या जागेचा मोबदला प्रशासनाकडून आधीच देण्यात आला होता. मात्र, तरीही त्यावरील ताबा न सोडल्याने ही बांधकामे पोलिस संरक्षणात हटविण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले आहे.मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. हा महामार्ग शहरानजीकच्या मिऱ्या येथून सुरू होत आहे. याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. यात रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांतील २९ गावांचा समावेश आहे. या महामार्गाच्या भूसंपादनाची जबाबदारी रत्नागिरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे देण्यात आली आहे. रत्नागिरीतील समावेश असलेल्या जमीनदारांना या जागेचा मोबदला देण्यात आला आहे. त्यानंतर या जमीनमालकांना जागेचा ताबा सोडण्याबाबत वारंवार नोटीसही पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, काहींनी अजूनही जमिनीचा ताबा सोडलेला नाही.

पावसाळ्यानंतर या महामार्गाचे काम द्रूतगतीने सुरू झाले आहे. त्यामुळे या घरांचा अडसर या कामाला होणार होता. शहरातील उद्यमनगर येथील झाडगाव ते कारवांची वाडी यादरम्यान अशी १५ बांधकामे आहेत. महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असल्याने ही बांधकामे तोडणे गरजेचे होते. मात्र, कल्पना देऊनही या जमीनमालकांनी या जमिनीचा अद्याप ताबा सोडलेला नव्हता.त्यामुळे सोमवारी यापैकी चंपक मैदान ते साळवी स्टाॅप यादरम्यानची ८ बांधकामे पोलिस संरक्षणात हटविण्यात आली. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थितीत होते. उर्वरित ७ बांधकामे मंगळवारी हटविण्यात येणार असल्याचे तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले.ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, भूसंपादन, भूमी अभिलेख आणि महसूल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. यावेळी या विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्ग