शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

रत्नागिरी-नागपूर महामार्ग रुंदीकरणाला गती, चौपदरीकरणातील बांधकामे हटविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:41 IST

रत्नागिरी : मिऱ्या- रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जागेत असलेली ८ बांधकामे तालुका प्रशासनाकडून सोमवारी हटविण्यात आली. ही ...

रत्नागिरी : मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जागेत असलेली ८ बांधकामे तालुका प्रशासनाकडून सोमवारी हटविण्यात आली. ही बांधकामे असलेल्या जागेचा मोबदला प्रशासनाकडून आधीच देण्यात आला होता. मात्र, तरीही त्यावरील ताबा न सोडल्याने ही बांधकामे पोलिस संरक्षणात हटविण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले आहे.मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. हा महामार्ग शहरानजीकच्या मिऱ्या येथून सुरू होत आहे. याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. यात रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांतील २९ गावांचा समावेश आहे. या महामार्गाच्या भूसंपादनाची जबाबदारी रत्नागिरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे देण्यात आली आहे. रत्नागिरीतील समावेश असलेल्या जमीनदारांना या जागेचा मोबदला देण्यात आला आहे. त्यानंतर या जमीनमालकांना जागेचा ताबा सोडण्याबाबत वारंवार नोटीसही पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, काहींनी अजूनही जमिनीचा ताबा सोडलेला नाही.

पावसाळ्यानंतर या महामार्गाचे काम द्रूतगतीने सुरू झाले आहे. त्यामुळे या घरांचा अडसर या कामाला होणार होता. शहरातील उद्यमनगर येथील झाडगाव ते कारवांची वाडी यादरम्यान अशी १५ बांधकामे आहेत. महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असल्याने ही बांधकामे तोडणे गरजेचे होते. मात्र, कल्पना देऊनही या जमीनमालकांनी या जमिनीचा अद्याप ताबा सोडलेला नव्हता.त्यामुळे सोमवारी यापैकी चंपक मैदान ते साळवी स्टाॅप यादरम्यानची ८ बांधकामे पोलिस संरक्षणात हटविण्यात आली. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थितीत होते. उर्वरित ७ बांधकामे मंगळवारी हटविण्यात येणार असल्याचे तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले.ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, भूसंपादन, भूमी अभिलेख आणि महसूल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. यावेळी या विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्ग