शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

विशेष सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:28 IST

राजापूर : कोरोनामुळे राजापूर उपनगराध्यक्ष निवडणूक रेंगाळली असून, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमिर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १९ एप्रिल रोजी विशेष ...

राजापूर : कोरोनामुळे राजापूर उपनगराध्यक्ष निवडणूक रेंगाळली असून, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमिर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १९ एप्रिल रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवडणूक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी, असा अहवाल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.

निकाल जाहीर

रत्नागिरी : पर्यावरण संस्था, रत्नागिरी शहर यांच्या वतीने तालुक्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ / वरिष्ठ महाविद्यालयांसाठी निबंध, घोषवाक्य, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, विविध स्पर्धांतून विजेते तीन क्रमांक घोषित करण्यात आले आहेत. बक्षीस वितरण सोहळा संबंधित शाळेतच होणार आहे.

पीक कर्ज योजनेला घरघर

रत्नागिरी : महात्मा ज्योतिबा फुले पीक कर्ज माफी योजना व नवीन पीक कर्ज वाटप मोजक्याच शेतकऱ्यांना केले जात आहे. २०२०-२१ साठी २ कोटी ५४ लाख ४१ हजार रुपये इतके कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. मात्र, गतवर्षी ६३.१६ लाख इतक्या रकमेचे कर्ज शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले.

कांद्याला मागणी

रत्नागिरी : लॉकडाऊन होण्याची शक्यता असल्याने कांदा खरेदीकरिता ग्राहक घाई करीत आहेत. त्यामुळे परजिल्ह्यातून व्यापारी कांदा विक्रीसाठी वाहन भरुन आणत असून, हातोहात हा कांदा संपत आहे. १५ ते १६ रुपये किलो दराने कांदा विक्री सुरु आहे. रत्नागिरीतील जे. के. फाईल्स, टीआरपी, माळनाका परिसरात कांदा विक्री सुरु आहे.

रस्त्याचे काम सुरु

रत्नागिरी : तालुक्यातील गडनरळ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत दोन किलोमीटर लांबीच्या ६७.३४ लाख निधीच्या या कामाला सुरुवात झाली आहे. काम मार्गी लागल्याबद्दल गडनरळवासियांनी समाधान व्यक्त केले आहे. या मार्गावर अवजड वाहतूक सुरु असल्याने रस्ता दुरुस्ती आवश्यक होती.

नुकसानभरपाईची मागणी

राजापूर : अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी तसेच कोकणातील शेतकऱ्यांच्या काजूबीला योग्य किंमत मिळावी, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली आहे.

रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन

रत्नागिरी : येथील मिरजाेळे औद्योगिक विकास महामंडळांतर्गत आदिष्टी बसस्टॉप ते गद्रे मरीन कंपनीपर्यंत रस्त्यांच्या मध्ये खड्डे पडले आहेत. अवजड वाहतुकीमुळे रस्ते निकृष्ट झाले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेता तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी नागरिकांमधून होत आहे. ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संस्थेकडून ही मागणी करण्यात आली आहे.