शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

कोकणातील पर्यटन स्थळांचे ‘आगर’ असलेले गुहागर; कुठं काय बघाल..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 17:38 IST

भगवान शंकरांचे वास्तव्यस्थान ‘गुह्यवन’ म्हणून गुहागर ओळखले जाते

संकेत गोयथळेगुहागर : निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला गुहागर तालुका पर्यटकांसाठी खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. ‘गुह’ म्हणजे कार्तिकस्वामी, त्यांनी संरक्षिलेले ‘आगर’ म्हणून गुहागर असे नाव पडल्याचे सांगितले जाते. तर, भगवान शंकरांचे वास्तव्यस्थान ‘गुह्यवन’ म्हणून गुहागर ओळखले जाते. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना मनसाेक्त निसर्गाचा आनंद लुटता येताे. तालुक्यातील वेळणेश्वर आणि हेदवी ही ठिकाण पर्यटनाचे केंद्र बनले आहे.

पालशेची पुराश्मयुगीन गुहाप्रा. डॉ. अशोक मराठे यांनी शोधलेली गुहागर तालुक्यातील सुसरोंडी-पालशेतची ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ आजही असंख्य पर्यटक- अभ्यासकांना खुणावते आहे. किमान ९० हजार वर्षे जुनी, भारताच्या साडेसात हजार किलाेमीटर लांब समुद्रकिनाऱ्यावरील ही पहिली गुहा आहे. ही गुहा म्हणजे, जगाच्या पुरातत्त्वीय पटलावर दिमाखाने मिरवू शकणारा आणि या विषयात जगात भारताची मान उंचावण्याची क्षमता असलेला अनमोल ठेवा आहे. याकडे शासनासह समाजाने 'पर्यटन' म्हणून सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.

बामणघळहेदवीचा दशभूज गणेश सर्व परिचित आहे, त्याचबरोबर हेदेवी गावाला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. वर्षानुवर्षे समुद्राच्या लाटांचा मारा होऊन येथील खडकावर एक मोठी अरुंद भेग (घळ) निर्माण झाली आहे. भरतीच्यावेळी समुद्राचे पाणी या घळईत जोराने घुसते व एखाद्या कारंज्याप्रमाणे वेगाने वर उसळते. ही घळ आता ‘बामणघळ’ म्हणून प्रसिद्ध आहे.

बुधल सडाबुधल गाव, बुधल सडा किंवा बुधल कोंड ही ठिकाणे सर्वसामान्य पर्यटकांच्या गुहागर दर्शनच्या यादीत नाहीत. गुहागर-वेळणेश्वर रस्त्यावर अडूर येथे उजवीकडे वळून जाणारा रस्ता थेट बुधल या ३०-४० उंबरठा असलेल्या गावात जातो. अडूर हे गाव पूर्वी ‘आड्यपूर’ नावाने ओळखले जात होते. या गावाच्या समुद्रकाठी असलेला भाग म्हणजे ‘बुधल’. याचेही पूर्वीचे नाव ‘बुद्धीलग्राम’ अथवा ‘बुद्धीलदुर्ग’ असे होते. त्या काळी हे एक चांगले बंदर होते.

हेदवी, वेळणेश्वरगुहागरच्या पर्यटन स्थळांमध्ये हेदवी व वेळणेश्वरचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. वेळणेश्वर हे बाराशे वर्षांपूर्वीपासून असलेले गाव आहे. ‘वेळेला’ म्हणजे ‘समुद्रकिनारा’ त्या तीरावर असणारा देव तो ‘वेळणेश्वर’. तसेच नवसाला पावला वेळ न लावणारा म्हणून ‘वेळणेश्वर’ अशी आख्यायिका आहे. वेळणेश्वर बरोबरच हेदवी गावच्या दशभूज गणेशाचे दर्शन घेतल्याशिवाय पर्यटक जात नाहीत.

दुसऱ्या बाजीरावाचा वाडारघुनाथ पेशवे व आनंदीबाई यांचा पुत्र दुसरा बाजीराव यांचा वाडा म्हणजेच ‘बाजीरावाचा वाडा’. असगोली वाळकेश्वर मंदिरापासून चढावाच्या रस्त्यात सागरी महामार्गावर हा वाडा होता. ही जागा खासगी असल्याने वाडा पाडून त्याच्या पायावर नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. येथून एका नजरेत गुहागरचा सात किलोमीटरचा संपूर्ण समुद्रकिनारा पाहायला मिळतो. गुहागर शहरात आज जिथे सार्वजनिक बांधकाम कार्यालय आहे ते ‘आनंदीबाई’चे पूजाघर मानले जाते.

गोपाळगड - अंजनवेलगुहागरपासून अंजनवेल गावातून थेट किल्ल्यापर्यंत मोटार रस्ता आहे. एकूण सात एकर क्षेत्रफळ असलेल्या या किल्ल्याची बरीचशी तटबंदी शाबूत आहे. जमिनीच्या बाजूने खंदक खोदलेला आढळतो. मूळ वरचा किल्ला विजापूरकरांनी १६ व्या शतकात बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १६६० च्या दाभोळ स्वारीच्या वेळी त्यांनी अंजनवेलचा हा किल्लाही ताब्यात घेतला होता.

टाळकेश्वर दीपगृहशेजारीच असलेल्या टाळकेश्वर मंदिरामुळे यासही टाळकेश्वर ‘दीपगृह’ म्हणतात. हे दीपगृह १९६० साली उभारण्यात आले आहे. दीपगृहाच्या उंच मनोऱ्यावरही तिकीट काढून जाता येते. इतक्या उंचीवरून अथांग निळा समुद्र आणि आजूबाजूचा परिसर असे चौफेर दर्शन घडते. गोपाळगडाबरोबरच दीपगृहावरून अथांग समुद्रकिनारा पाहण्याला पर्यटक पसंती देतात. अंजनवेल दीपगृहाशेजारीच टाळकेश्वर मंदिर आहे. तसेच मंदिराच्या खालील बाजूस डोंगराच्या सुळक्याला छोटी बांधकाम तटबंदी करून करण्यात आलेल्या ‘टायटॅनिक पॉईंट’वरून समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकावर पाहता येतात.

एन्राॅन प्रकल्प व धोपावे फेरीबोट सेवागुहागरवरून दापोलीकडे जाताना रस्त्यालगेचच बहुचर्चित इंधन प्रकल्प म्हणजेच सध्याचा आरजीपीपीएल कंपनी पाहायला मिळते. त्यानंतर वीस वर्षांपूर्वी कोकणात प्रथमच झालेली धोपावे-दाभोळ फेरीबोट सेवेतून वाहनासह पलीकडे जाण्याचा व खाडी दर्शन करण्याचा पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येतो.

गुहागरचे व्याडेश्वर मंदिरगावच्या बाजारपेठेतच श्री व्याडेश्वराचे प्राचीन देवस्थान आहे. गुहागरमध्ये पूर्वी खूप वाड्या होत्या, त्या ‘वाड्यांचा देव’ तो व्याडेश्वर किंवा परशुराम शिष्य ‘व्याडी’ मुनींनी स्थापना करून त्यावर वाडा बांधला म्हणून ‘व्याडेश्वर’ किंवा ‘वाड’ म्हणजे ‘तबेल्या’ जवळ हे लिंग सापडले म्हणून ‘व्याडेश्वर’ नाव पडले, अशा कथा सांगतात.

समुद्रकिनाऱ्याची तब्बल सात किलोमीटर लांबी

गुहागर शहराला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्याची तब्बल सात किलोमीटर लांबी आहे. चेन्नई येथील मरीना बीच १२ किलोमीटर असून, तो जगात तिसऱ्या स्थानावर आहे. सलग सात किलोमीटर लाभलेली किनारपट्टी व स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात डुंबण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही.

गुहागरमधील समुद्रकिनारेगुहागर, पालशेत, अडूर - बुधल, बोऱ्याबंदर, हेदवी, वेळणेश्वर, रोहिले, तवसाळ.

प्रसिद्ध मंदिरेव्याडेश्वर मंदिर, दुर्गादेवी मंदिर, वेळणेश्वर मंदिर, हेदवी दशभुज गणेश मंदिर.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटनguhagar-acगुहागर