शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

धनुष्यबाण शिंदेसेनेचाच; राज्यात आमचीच ताकद अधिक : मंत्री सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: June 17, 2024 19:15 IST

'शिंदेसेनेने मिळवलेले यश उद्धवसेनेपेक्षा मोठे'

रत्नागिरी : लोकसभा निवडणूक निकालानंतर धनुष्यबाण निशाणीबाबत काही गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र चिन्ह कोणाला द्यावे, याबाबतचे निकष आहेत. त्यासाठी घटना पाहिली जाते. त्यामुळे या चर्चांना कोणताही आधार नाही, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत सांगितले. त्यातही शिंदेसेनेने निवडणुकीत मिळवलेले यश उद्धवसेनेपेक्षा मोठे असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.लोकसभा निवडणुकीत उद्धवसेना अधिक जागा जिंकली आहे, असे सांगत धनुष्यबाण निशाणीबाबत गैरसमज पसरवण्याचे काम काही लोक करत आहेत. मात्र चिन्ह कोणाचे हे ठरवण्याचे निकष वेगळे आहेत, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट अधिक आहे. शिंदेसेनेने १५ जागा लढवल्या आणि त्यात सातजण वीजयी झाले. उद्धवसेनेने २३ जागा लढवल्या आणि त्यात त्यांचे ९ उमेदवार विजयी झाले. शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट ४६.६७ टक्के आहे तर उद्धवसेनेचा ४२.६६ टक्के आहे. मतांच्या सरासरीमध्यही शिंदेसेनेला उद्धवसेनेपेक्षा अडीच लाख मते अधिक आहेत. राज्यात १३ ठिकाणी शिंदेसेना आणि उद्धवसेना आमनेसामने लढत झाली. त्यात ७ ठिकाणी शिंदेसेनेला यश आले आहे. शिंदेसेनेचे सरासरी मताधिक्य १ लाख ६ हजार आहे तर उद्धवसेनेचे सरासरी मताधिक्य ८६ हजार ९४४ आहे. प्रत्येक बाबतीत शिंदेसेनेने उद्धवसेनेला मात दिली आहे. त्यामुळे आता बिनबुडाच्या चर्चा कोणी करु नयेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे