शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

साैंदळ येथे मातीचा भराव टाकावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:34 IST

राजापूर : गतवर्षी पावसाळ्यात ओणी, अणुस्कुरा मार्गावर सौंदळ रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर पुराचे पाणी मोठ्याप्रमाणावर साचून त्या मार्गावरील संपूर्ण ...

राजापूर :

गतवर्षी पावसाळ्यात ओणी, अणुस्कुरा मार्गावर सौंदळ रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर पुराचे पाणी मोठ्याप्रमाणावर साचून त्या मार्गावरील संपूर्ण वाहतूक दीर्घकाळ बंद पडल्या हाेत्या. दरम्यान, सौंदळमधील त्या खोलगट भागात मातीचा भराव टाकून त्याची उंची वाढविणे आवश्यक असून शासनाने त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी आता वाढू लागली आहे.

सौंदळमधील रेल्वेस्टेशनपासून काही अंतरावर असलेला हा भाग खोलगट आहे. गेले दोन वर्षे झालेल्या अतिवृष्टीत या मार्गावर पुराचा वेढा पडला होता. गतवर्षी तर दोन दिवस मार्गावरील पुराचे पाणी न ओसरल्याने पूर्व परिसराकडील वाहतूक बंद होती. या मार्गावरील काही भाग खोलगट असल्याने तोच भाग पाण्याखाली असतो आणि वाहतूक बंद पडते. यावर्षी ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज यापूर्वी काही तज्ज्ञांनी वर्तविला आहे. तालुक्यात पूर्व परिसरात जोरदार वृष्टी होत असते. तालुक्याच्या अन्य भागांच्या तुलनेत या परिसरात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे यावर्षीही अतिवृष्टीनंतर सौंदळमध्ये पाणी साचून वाहतुकीला व्यत्यय येण्याचा धोका कायम आहे, ही अडचण लक्षात घेऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने सौंदळ मार्गावर ज्या खोलगट भागात मोठ्याप्रमाणावर पुराचे पाणी साचून वाहतुकीला व्यत्यय येतो, तो भाग मातीचा भराव टाकून उंच करावा व रस्त्याची उंची वाढवावी, त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.