शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

साैंदळ येथे मातीचा भराव टाकावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:34 IST

राजापूर : गतवर्षी पावसाळ्यात ओणी, अणुस्कुरा मार्गावर सौंदळ रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर पुराचे पाणी मोठ्याप्रमाणावर साचून त्या मार्गावरील संपूर्ण ...

राजापूर :

गतवर्षी पावसाळ्यात ओणी, अणुस्कुरा मार्गावर सौंदळ रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर पुराचे पाणी मोठ्याप्रमाणावर साचून त्या मार्गावरील संपूर्ण वाहतूक दीर्घकाळ बंद पडल्या हाेत्या. दरम्यान, सौंदळमधील त्या खोलगट भागात मातीचा भराव टाकून त्याची उंची वाढविणे आवश्यक असून शासनाने त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी आता वाढू लागली आहे.

सौंदळमधील रेल्वेस्टेशनपासून काही अंतरावर असलेला हा भाग खोलगट आहे. गेले दोन वर्षे झालेल्या अतिवृष्टीत या मार्गावर पुराचा वेढा पडला होता. गतवर्षी तर दोन दिवस मार्गावरील पुराचे पाणी न ओसरल्याने पूर्व परिसराकडील वाहतूक बंद होती. या मार्गावरील काही भाग खोलगट असल्याने तोच भाग पाण्याखाली असतो आणि वाहतूक बंद पडते. यावर्षी ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज यापूर्वी काही तज्ज्ञांनी वर्तविला आहे. तालुक्यात पूर्व परिसरात जोरदार वृष्टी होत असते. तालुक्याच्या अन्य भागांच्या तुलनेत या परिसरात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे यावर्षीही अतिवृष्टीनंतर सौंदळमध्ये पाणी साचून वाहतुकीला व्यत्यय येण्याचा धोका कायम आहे, ही अडचण लक्षात घेऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने सौंदळ मार्गावर ज्या खोलगट भागात मोठ्याप्रमाणावर पुराचे पाणी साचून वाहतुकीला व्यत्यय येतो, तो भाग मातीचा भराव टाकून उंच करावा व रस्त्याची उंची वाढवावी, त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.