शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम दिवसरात्र चालणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 17:38 IST

वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी चिपळूणवासीयांनी मोठा लढा दिल्यानंतर गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

चिपळूण : वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी चिपळूणवासीयांनी मोठा लढा दिल्यानंतर गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सोमवारपासून दिवसा आणि रात्री दोन्ही सत्रांत नदीतील गाळ काढला जाणार आहे. वाशिष्ठी नदीतील ७ लाख ८५ हजार, तर शिव नदीतील ४ लाख क्युबिक मीटर गाळ काढणार आहोत. गाळ काढल्यानंतर पूररेषेचे पुन्हा सर्वेक्षण केले जाईल. चिपळूणवासीयांना महाविकास आघाडी सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चिपळुणातील पत्रकार परिषदेत दिले.

वाशिष्टी व शिव नदीत सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाची मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पाहणी केली. त्यानंतर प्रांत कार्यालयात संबंधित जलसंपदा विभागाकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, महापुरानंतर चिपळूणवासीयांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. त्याचा परिपाक म्हणून राज्यात सर्वाधिक मोठे गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

महिना अखेर वाशिष्ठी नदीतील ७ लाख ८५ हजार, तर शिव नदीतील ३.७५ लाख क्यूबिक मीटर गाळ काढणार आहोत. मेपर्यंत हे काम सुरूच राहील. कामाची गती वाढावी यासाठी दिवस आणि रात्र दोन्ही वेळेत हे काम केले जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. नाम फाउंडेशनने शिव नदीसाठी मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यांचे आणखी दोन पोकलेन वाशिष्ठी नदीसाठी मिळणार आहेत. शासनाने याकामी दहा कोटींचा निधी केवळ डिझेलसाठी दिला आहे. त्यामुळे डिझेल या खर्चासाठी निधीची कमतरता भासणार नाही. सरकारने ३२०० कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्यातील विविध कामे मार्गी लावली जातील, असे त्यांनी सांगितले.

गाळ काढण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करायला हवे. तसेच काढलेला गाळ हा सर्व शासकीय जागा, म्हाडाची जागा, खुली मैदाने, नगर परिषदेची प्रस्तावित रस्ते येथे टाकण्यात येईल. नदीमध्ये जिथे अतिक्रमण असतील ती काढण्याची सूचना सामंत यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पोलीस उपअधीक्षक सचिन भारी, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, शहरप्रमुख उमेश सपकाळ उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत