शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम दिवसरात्र चालणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 17:38 IST

वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी चिपळूणवासीयांनी मोठा लढा दिल्यानंतर गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

चिपळूण : वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी चिपळूणवासीयांनी मोठा लढा दिल्यानंतर गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सोमवारपासून दिवसा आणि रात्री दोन्ही सत्रांत नदीतील गाळ काढला जाणार आहे. वाशिष्ठी नदीतील ७ लाख ८५ हजार, तर शिव नदीतील ४ लाख क्युबिक मीटर गाळ काढणार आहोत. गाळ काढल्यानंतर पूररेषेचे पुन्हा सर्वेक्षण केले जाईल. चिपळूणवासीयांना महाविकास आघाडी सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चिपळुणातील पत्रकार परिषदेत दिले.

वाशिष्टी व शिव नदीत सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाची मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पाहणी केली. त्यानंतर प्रांत कार्यालयात संबंधित जलसंपदा विभागाकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, महापुरानंतर चिपळूणवासीयांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. त्याचा परिपाक म्हणून राज्यात सर्वाधिक मोठे गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

महिना अखेर वाशिष्ठी नदीतील ७ लाख ८५ हजार, तर शिव नदीतील ३.७५ लाख क्यूबिक मीटर गाळ काढणार आहोत. मेपर्यंत हे काम सुरूच राहील. कामाची गती वाढावी यासाठी दिवस आणि रात्र दोन्ही वेळेत हे काम केले जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. नाम फाउंडेशनने शिव नदीसाठी मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यांचे आणखी दोन पोकलेन वाशिष्ठी नदीसाठी मिळणार आहेत. शासनाने याकामी दहा कोटींचा निधी केवळ डिझेलसाठी दिला आहे. त्यामुळे डिझेल या खर्चासाठी निधीची कमतरता भासणार नाही. सरकारने ३२०० कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्यातील विविध कामे मार्गी लावली जातील, असे त्यांनी सांगितले.

गाळ काढण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करायला हवे. तसेच काढलेला गाळ हा सर्व शासकीय जागा, म्हाडाची जागा, खुली मैदाने, नगर परिषदेची प्रस्तावित रस्ते येथे टाकण्यात येईल. नदीमध्ये जिथे अतिक्रमण असतील ती काढण्याची सूचना सामंत यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पोलीस उपअधीक्षक सचिन भारी, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, शहरप्रमुख उमेश सपकाळ उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत