शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

रत्नागिरीत सहा विहिरी एका रात्रीत आटल्या, पाण्याचा खडखडाट

By मेहरून नाकाडे | Updated: March 23, 2024 18:16 IST

रत्नागिरी : सध्या उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला असून बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. गुरूवारी (दि.२२ मार्च) शहरातील शिवाजीनगर परिसरातील विहिरीत ...

रत्नागिरी : सध्या उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला असून बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. गुरूवारी (दि.२२ मार्च) शहरातील शिवाजीनगर परिसरातील विहिरीत चार ते साडेचार फूट पाण्याची पातळी असताना, शुक्रवारी (दि.२३) रोजी अचानक विहिरीमध्ये पाण्याचा खडखडात झाला. दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.२४) पाण्याचा खडखडाट कायम होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे पाण्याशिवाय हाल होणार असून भविष्यात शहराला मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.शहरातील शिवाजीनगर परिसरातील आसपासच्या सहा विहिरी एका रात्रीत आटल्या आहेत. गतवर्ष झालेला कमी पाऊस, शिवाय पाण्याचा मोठ्या प्रमाणावरील उपसा यामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यावर याचा परिणाम होणार आहे. त्यातच रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या शीळ धरणातीलही पाणीसाठा कमी झाल्याने शहरात सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सुरू आहे. एप्रिलमध्ये शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच पाणी समस्या निर्माण झाली असताना त्यातच विहिरी आटल्यामुळे परिसरातील नागरिकांना भीषण टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या परिसरात असलेल्या पाणी व्यवसायिकांचाही व्यवसाय संकटात आला आहे.दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर येथील विहिरींमध्ये मुबलक पाणी होते, परंतु शुक्रवारी सकाळी विहीरींचे पंप सुरू करण्यासाठी नागरिक गेल्यानंतर खडखडाट झाल्याचे लक्षात आले. ही गोष्ट शहरात पसरताच कोरड्या झालेल्या विहिरी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली. पाण्याचा अति उपसा व वाढता उष्मा यामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यात घट झाली असल्याचा अंदाज भूजल विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विहिरींमधील पाण्याचे नमूने, पाणीपातळी घेण्यात आली आहे. परंतु कोणत्याही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीपातळीत घट झालेल्या अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील परिसरात असलेल्या विहिरींच्या पातळीत मात्र घट का झाली याचे स्वतंत्रपणे संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

शिवाजीनगर या भागात पाण्याचा स्त्रोत चांगला असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी व्यवसायिकांच्या विहिरी या परिसरात आहेत. बहुतांश शहराला याच भागातील व्यावसायिक पाणी पुरवठा करतात. गुरूवार (दि.२२) पर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित असताना, अचानक झालेल्या खडखडाटामुळे पाणी व्यवसाय धोक्यात आला, शिवाय नागरिकांचेही हाल होणार आहेत.

गेली ३२ वर्ष शिवाजीनगर परिसरात पाणीपुरवठा व्यवसायिक म्हणून कार्यरत आहेत. जून महिना संपला तरी आमच्या विहिरीचे पाणी कधी आटत नव्हते. मात्र यावर्षी अचानक पाणी कमी झाले व विहिरीत खडखडाट झाला. त्यामुळे पाणी व्यवसाय बंद करावा लागला आहे. - कुंदन सावंत, पाणी पुरवठा व्यावसायिक

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीdroughtदुष्काळ