शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

रत्नागिरीत सहा विहिरी एका रात्रीत आटल्या, पाण्याचा खडखडाट

By मेहरून नाकाडे | Updated: March 23, 2024 18:16 IST

रत्नागिरी : सध्या उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला असून बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. गुरूवारी (दि.२२ मार्च) शहरातील शिवाजीनगर परिसरातील विहिरीत ...

रत्नागिरी : सध्या उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला असून बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. गुरूवारी (दि.२२ मार्च) शहरातील शिवाजीनगर परिसरातील विहिरीत चार ते साडेचार फूट पाण्याची पातळी असताना, शुक्रवारी (दि.२३) रोजी अचानक विहिरीमध्ये पाण्याचा खडखडात झाला. दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.२४) पाण्याचा खडखडाट कायम होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे पाण्याशिवाय हाल होणार असून भविष्यात शहराला मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.शहरातील शिवाजीनगर परिसरातील आसपासच्या सहा विहिरी एका रात्रीत आटल्या आहेत. गतवर्ष झालेला कमी पाऊस, शिवाय पाण्याचा मोठ्या प्रमाणावरील उपसा यामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यावर याचा परिणाम होणार आहे. त्यातच रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या शीळ धरणातीलही पाणीसाठा कमी झाल्याने शहरात सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सुरू आहे. एप्रिलमध्ये शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच पाणी समस्या निर्माण झाली असताना त्यातच विहिरी आटल्यामुळे परिसरातील नागरिकांना भीषण टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या परिसरात असलेल्या पाणी व्यवसायिकांचाही व्यवसाय संकटात आला आहे.दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर येथील विहिरींमध्ये मुबलक पाणी होते, परंतु शुक्रवारी सकाळी विहीरींचे पंप सुरू करण्यासाठी नागरिक गेल्यानंतर खडखडाट झाल्याचे लक्षात आले. ही गोष्ट शहरात पसरताच कोरड्या झालेल्या विहिरी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली. पाण्याचा अति उपसा व वाढता उष्मा यामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यात घट झाली असल्याचा अंदाज भूजल विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विहिरींमधील पाण्याचे नमूने, पाणीपातळी घेण्यात आली आहे. परंतु कोणत्याही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीपातळीत घट झालेल्या अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील परिसरात असलेल्या विहिरींच्या पातळीत मात्र घट का झाली याचे स्वतंत्रपणे संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

शिवाजीनगर या भागात पाण्याचा स्त्रोत चांगला असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी व्यवसायिकांच्या विहिरी या परिसरात आहेत. बहुतांश शहराला याच भागातील व्यावसायिक पाणी पुरवठा करतात. गुरूवार (दि.२२) पर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित असताना, अचानक झालेल्या खडखडाटामुळे पाणी व्यवसाय धोक्यात आला, शिवाय नागरिकांचेही हाल होणार आहेत.

गेली ३२ वर्ष शिवाजीनगर परिसरात पाणीपुरवठा व्यवसायिक म्हणून कार्यरत आहेत. जून महिना संपला तरी आमच्या विहिरीचे पाणी कधी आटत नव्हते. मात्र यावर्षी अचानक पाणी कमी झाले व विहिरीत खडखडाट झाला. त्यामुळे पाणी व्यवसाय बंद करावा लागला आहे. - कुंदन सावंत, पाणी पुरवठा व्यावसायिक

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीdroughtदुष्काळ