शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

शिवभक्तांनी केली जयगड किल्ल्याची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:02 AM

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड, किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी राजा शिवछत्रपती परिवाराने पाऊल उचलले आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या सहाशे परिवाराच्या सदस्यांनी रत्नागिरी तालुक्यातील किल्ले जयगडची साफसफाई केली.

ठळक मुद्देशिवभक्तांनी केली जयगड किल्ल्याची साफसफाईराजा शिवछत्रपती परिवाराची सफाई

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचे गड, किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी राजा शिवछत्रपती परिवाराने पाऊल उचलले आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या सहाशे परिवाराच्या सदस्यांनी रत्नागिरी तालुक्यातील किल्ले जयगडची साफसफाई केली.छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड, किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. बुरुज, तटबंदी ढासळत आहेत त्यांचे जतन करणे आणि ही संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करणे गरजेचे आहे. यासाठी स्थापन झालेल्या राजा शिवछत्रपती परिवाराचे सदस्य राज्यभरात या संवर्धनाचे काम करीत आहेत.या परिवाराचे सदस्य रत्नागिरीत दाखल झाले होते. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून परिवाराची जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर श्रीदेव भैरी बुवांच्या मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार सेनानी मायाजी भाटकर उर्फ मायनाक भंडारी यांच्या भाट्ये येथील समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण जयगड किल्ल्यावर गेले होते.राजा शिवछत्रपती परिवाराकडून किल्ले जयगड येथील संपूर्ण परिसर बालेकिल्ला, खंदकाची सफाई, तटबंदिवरची झुडपे, परकोटाची सफाई, बुरूज सफाई व इतर परिसर स्वच्छ करण्यात आला, अशी माहिती रत्नागिरी परिवाराचे उपेंद्र नागवेकर यांनी दिली.

 

टॅग्स :FortगडRatnagiriरत्नागिरी