शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शिवभक्तांनी केली जयगड किल्ल्याची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:04 IST

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड, किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी राजा शिवछत्रपती परिवाराने पाऊल उचलले आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या सहाशे परिवाराच्या सदस्यांनी रत्नागिरी तालुक्यातील किल्ले जयगडची साफसफाई केली.

ठळक मुद्देशिवभक्तांनी केली जयगड किल्ल्याची साफसफाईराजा शिवछत्रपती परिवाराची सफाई

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचे गड, किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी राजा शिवछत्रपती परिवाराने पाऊल उचलले आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या सहाशे परिवाराच्या सदस्यांनी रत्नागिरी तालुक्यातील किल्ले जयगडची साफसफाई केली.छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड, किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. बुरुज, तटबंदी ढासळत आहेत त्यांचे जतन करणे आणि ही संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करणे गरजेचे आहे. यासाठी स्थापन झालेल्या राजा शिवछत्रपती परिवाराचे सदस्य राज्यभरात या संवर्धनाचे काम करीत आहेत.या परिवाराचे सदस्य रत्नागिरीत दाखल झाले होते. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून परिवाराची जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर श्रीदेव भैरी बुवांच्या मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार सेनानी मायाजी भाटकर उर्फ मायनाक भंडारी यांच्या भाट्ये येथील समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण जयगड किल्ल्यावर गेले होते.राजा शिवछत्रपती परिवाराकडून किल्ले जयगड येथील संपूर्ण परिसर बालेकिल्ला, खंदकाची सफाई, तटबंदिवरची झुडपे, परकोटाची सफाई, बुरूज सफाई व इतर परिसर स्वच्छ करण्यात आला, अशी माहिती रत्नागिरी परिवाराचे उपेंद्र नागवेकर यांनी दिली.

 

टॅग्स :FortगडRatnagiriरत्नागिरी