शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

शिवभक्तांनी केली जयगड किल्ल्याची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:04 IST

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड, किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी राजा शिवछत्रपती परिवाराने पाऊल उचलले आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या सहाशे परिवाराच्या सदस्यांनी रत्नागिरी तालुक्यातील किल्ले जयगडची साफसफाई केली.

ठळक मुद्देशिवभक्तांनी केली जयगड किल्ल्याची साफसफाईराजा शिवछत्रपती परिवाराची सफाई

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचे गड, किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी राजा शिवछत्रपती परिवाराने पाऊल उचलले आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या सहाशे परिवाराच्या सदस्यांनी रत्नागिरी तालुक्यातील किल्ले जयगडची साफसफाई केली.छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड, किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. बुरुज, तटबंदी ढासळत आहेत त्यांचे जतन करणे आणि ही संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करणे गरजेचे आहे. यासाठी स्थापन झालेल्या राजा शिवछत्रपती परिवाराचे सदस्य राज्यभरात या संवर्धनाचे काम करीत आहेत.या परिवाराचे सदस्य रत्नागिरीत दाखल झाले होते. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून परिवाराची जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर श्रीदेव भैरी बुवांच्या मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार सेनानी मायाजी भाटकर उर्फ मायनाक भंडारी यांच्या भाट्ये येथील समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण जयगड किल्ल्यावर गेले होते.राजा शिवछत्रपती परिवाराकडून किल्ले जयगड येथील संपूर्ण परिसर बालेकिल्ला, खंदकाची सफाई, तटबंदिवरची झुडपे, परकोटाची सफाई, बुरूज सफाई व इतर परिसर स्वच्छ करण्यात आला, अशी माहिती रत्नागिरी परिवाराचे उपेंद्र नागवेकर यांनी दिली.

 

टॅग्स :FortगडRatnagiriरत्नागिरी