शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या नात्यात दरार, भाजप-मनसे जोडीदार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:28 IST

Bjp mns ratnagirinews- शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी करण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांचे विरोधक सारखेच असल्याने हे नवीन मेतकूट जुळण्याची तयारी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या नात्यात दरार, भाजप-मनसे जोडीदार ? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मेतकूट जमण्याची शक्यता

मनोज मुळ्येरत्नागिरी : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी करण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांचे विरोधक सारखेच असल्याने हे नवीन मेतकूट जुळण्याची तयारी सुरू झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद सर्वात मोठी आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचाच वाटा खूप मोठा आहे. जिल्ह्यात पाचपैकी चार आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेचे पारडे जड आहे. एक आमदार राष्ट्रवादीचा असल्याने राष्ट्रवादीकडेही चांगली ताकद आहे.

भाजपची पंचायत समितीत मर्यादित ताकद आहे. काँग्रेस खूप क्षीण झाली आहे आणि मनसेला अजून राजकीय पातळीवर अपवादात्मक यश मिळाले आहे. या एकूणच राजकीय बलाबलामध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे.राज्याच्या सत्तेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसही सहभागी आहे. त्यामुळे जिल्ह्यातही हीच महाविकास आघाडी व्हावी, असे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाटते. अशी महाविकास आघाडी करण्याबाबत अजून या पक्षांपैकी कोणीही पुढाकार घेतलेला नाही. मात्र, ही महाविकास आघाडी कोणत्याही क्षणी होऊ शकेल, अशी शक्यता आहे.

अशी आघाडी झाली तर ती भाजप विरोधातच उभी राहील. त्यामुळे भाजपने आतापासूनच जोडीदार म्हणून मनसेकडे हात पुढे केला असल्याचे समजते. जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यात शक्य तेथे एकमेकांना मदत करुन निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा जिथे आशा आहे, अशा ठिकाणी जोर दिला जाण्याची शक्यता आहे.पटवर्धन-चव्हाण मैत्रीभाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्यामध्ये आधीपासूनच मैत्री आहे. त्यामुळे ही मैत्री आता ग्रामपंचायत निवडणुकीत दृढ होण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत कधीही न झालेली ही युती आता होण्याची तयारी सुरू झाली आहे.काहीही घडू शकतंमनसेसोबत युती होणार आहे का, तशी चर्चा सुरू झाली असल्याची माहिती कितपत सत्य आहे, याबाबत बोलताना ह्यराजकारणात कधीही, काहीही घडू शकते, एवढ्या मोजक्याच शब्दात ॲड. दीपक पटवर्धन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत येत्या काही दिवसातच सगळे चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाMNSमनसेRatnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायत