शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

शिवसेनेच्या नात्यात दरार, भाजप-मनसे जोडीदार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:28 IST

Bjp mns ratnagirinews- शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी करण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांचे विरोधक सारखेच असल्याने हे नवीन मेतकूट जुळण्याची तयारी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या नात्यात दरार, भाजप-मनसे जोडीदार ? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मेतकूट जमण्याची शक्यता

मनोज मुळ्येरत्नागिरी : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी करण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांचे विरोधक सारखेच असल्याने हे नवीन मेतकूट जुळण्याची तयारी सुरू झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद सर्वात मोठी आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचाच वाटा खूप मोठा आहे. जिल्ह्यात पाचपैकी चार आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेचे पारडे जड आहे. एक आमदार राष्ट्रवादीचा असल्याने राष्ट्रवादीकडेही चांगली ताकद आहे.

भाजपची पंचायत समितीत मर्यादित ताकद आहे. काँग्रेस खूप क्षीण झाली आहे आणि मनसेला अजून राजकीय पातळीवर अपवादात्मक यश मिळाले आहे. या एकूणच राजकीय बलाबलामध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे.राज्याच्या सत्तेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसही सहभागी आहे. त्यामुळे जिल्ह्यातही हीच महाविकास आघाडी व्हावी, असे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाटते. अशी महाविकास आघाडी करण्याबाबत अजून या पक्षांपैकी कोणीही पुढाकार घेतलेला नाही. मात्र, ही महाविकास आघाडी कोणत्याही क्षणी होऊ शकेल, अशी शक्यता आहे.

अशी आघाडी झाली तर ती भाजप विरोधातच उभी राहील. त्यामुळे भाजपने आतापासूनच जोडीदार म्हणून मनसेकडे हात पुढे केला असल्याचे समजते. जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यात शक्य तेथे एकमेकांना मदत करुन निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा जिथे आशा आहे, अशा ठिकाणी जोर दिला जाण्याची शक्यता आहे.पटवर्धन-चव्हाण मैत्रीभाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्यामध्ये आधीपासूनच मैत्री आहे. त्यामुळे ही मैत्री आता ग्रामपंचायत निवडणुकीत दृढ होण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत कधीही न झालेली ही युती आता होण्याची तयारी सुरू झाली आहे.काहीही घडू शकतंमनसेसोबत युती होणार आहे का, तशी चर्चा सुरू झाली असल्याची माहिती कितपत सत्य आहे, याबाबत बोलताना ह्यराजकारणात कधीही, काहीही घडू शकते, एवढ्या मोजक्याच शब्दात ॲड. दीपक पटवर्धन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत येत्या काही दिवसातच सगळे चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाMNSमनसेRatnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायत