शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

मतलई वाऱ्यामुळे सागरी मासेमारी झाली ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:59 PM

रत्नागिरी : हवामानातील सातत्यपूर्ण चढ - उतारांमुळे १ आॅगस्टपासून सुरू झालेल्या सागरी मासेमारी हंगामाला अद्याप सूर सापडलेला नाही. आता ...

रत्नागिरी : हवामानातील सातत्यपूर्ण चढ - उतारांमुळे १ आॅगस्टपासून सुरू झालेल्या सागरी मासेमारी हंगामाला अद्याप सूर सापडलेला नाही. आता पुन्हा एकदा जोरदार मतलई वाºयामुळे सागरी मासेमारी सलग तिसºया दिवशी ठप्प झाली. आता तरी वातावरणात बदल होईल का व पुन्हा मासेमारी सुरू होईल का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. मासेमारीच ठप्प झाल्याने बाजारपेठेतही मासळीची आयात रोडावली आहे. लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.१ आॅगस्ट २०१९ पासून राज्याच्या सागरी हद्दीत पारंपरिक मासेमारी सुरू झाली. त्यानंतर १ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारी सुरू झाली. मात्र, अनेक संकटांच्या गर्तेमध्ये मच्छिमारी व्यवसाय पुरता भरडला गेला आहे. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या चार महिन्यांच्या काळातील पर्ससीन मासेमारीही यंदा फारशी चालली नाही. निसर्गाच्या अवकृपेमुळे सातत्याने मासेमारी ठप्प झाली. त्यामुळे यावर्षी मत्स्योत्पादनातही घट होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मत्स्यदुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली जात आहे.पर्ससीन मासेमारीला अवघे चार महिनेच मुदत असल्याने ती पुरेशी नाही, यंदा हंगाम चाललाच नाही, अशी तक्रार पर्ससीन मच्छीमारांमधून केली जात आहे. त्यामुळे चार महिन्यांची मुदत आणखी दोन महिने वाढवून मिळावी, अशी पर्ससीन मच्छीमारांची मागणी आहे. त्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडेही पर्ससीन मच्छिमारांच्या संघटनेकडून पाठपुरावा केला जात आहे. तर पर्ससीन मासेमारी संपल्यानंतरही एलईडी मासेमारी करून मासळी किनाºयावरच येऊ दिली जात नसल्याचा आरोप पारंपरिक मच्छिमारांमधून केला जात आहे.पर्ससीन व पारंपरिक मच्छिमारांमधील संघर्ष कायम आहे. त्यातच या दोन्ही प्रकारांमधील मासेमारीला सुरू असलेल्या हंगामात नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. गेल्या तीन दिवसांपासून मतलई वारे वाहू लागल्याने मासळी खोल समुद्रात पसार झाली आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांना जवळच्या अंतरावर मासळी मिळणेच दुरापास्त झाले आहे. हवामानात योग्य बदलानंतरच पुन्हा मासेमारी सुरू होण्याची शक्यता आहे.एलईडीला विरोध : २६ला धरणे आंदोलन२६ जानेवारीला रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एलईडी मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छिमारांचे धरणे आंदोलन.पारंपरिक व पर्ससीन मच्छिमारांना यंदाचा हंगाम गेला तोट्यात.१ आॅगस्ट २०२० पासून मासेमारी हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे मासेमारीला दणका.मतलई वाºयामुळे मासेमारीवर परिणाम झाला, हे बरोबर आहे. परंतु पर्ससीन मासेमारी बंद होऊन अद्याप एलईडी मासेमारी सुरूच असल्याने म्हाकुल व अन्य मासळी बाहेरच्या सागरी क्षेत्रात पकडली जाते. किनाºयावर मासळी येत नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे मत मच्छिमार नेते आप्पा वांदरकर यांनी व्यक्त केले.सध्या मतलई वाऱ्यांमुळे सागरी मासेमारी ठप्प झाली आहे. गुरुवारी मासेमारीसाठी गेलेल्या सर्व नौका किनाºयावर परतल्या आहेत. मतलई वाºयांमुळे नौका समुद्रात नेणेही धोकादायक बनले आहे, अशी माहिती मच्छीमार नेते नदीम सोलकर यांनी ‘लोकमत’ला दिली. एलईडी मासेमारी होत असल्याचे सांगितले सांगितले जात आहे, याबाबत विचारता सोलकर म्हणाले, एलईडी मासेमारी किती प्रमाणात सुरू आहे हे सांगता येणार नाही. परंतु अशा नौका ६५ ते १०० किलोमीटर सागरी क्षेत्रात जातात. त्यांना एका फेरीसाठी २४०० लिटर डिझेल लागते. एवढा खर्च करून मासेही मिळत नाहीत.