शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग सुरु, यावर्षीही महागाईचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 14:31 IST

वर्षभर ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागते, त्या बाप्पाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेशोत्सवासाठी दोन महिन्यांचा कालावधी असला तरी मूर्तिशाळांमध्ये कामाची लगबग सुरू झाली आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग सुरु, यावर्षीही महागाईचा फटका शाडूच्या मातीच्या दरात वाढ, सर्वच मूर्तिशाळांमध्ये कुशल कारागिरांची उणीव

रत्नागिरी : वर्षभर ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागते, त्या बाप्पाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेशोत्सवासाठी दोन महिन्यांचा कालावधी असला तरी मूर्तिशाळांमध्ये कामाची लगबग सुरू झाली आहे.कोकणात घरोघरी गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. बहुतांश मूर्तिकारांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर माती भिजवून कामाचा शुभारंभ केला आहे. प्रामुख्याने शाडूच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. शाडूची माती गुजरात राज्यातील भावनगर येथून मागविली जाते. भावनगरहून पेण येथे माती आयात केल्यानंतर महाराष्ट्रभर मातीचे वितरण केले जाते.

इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढत असल्याने शाडूच्या मातीच्या दरात वाढ झाली आहे. गतवर्षी शाडूच्या मातीचे पोते ३५० ते ३६० रूपये दराने विकण्यात येत होते. यावर्षी याच पोत्याची विक्री ३८० ते ४०० रूपये दराने सुरू आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे माती, रंगाच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तींच्या किंमतीही वाढणार आहेत.भिजवलेल्या मातीचा गोळा साच्यात ठेवून त्याला सुंदर गणेश मूर्तीचा आकार देण्यात येतो. मूर्तिवरील कोरीव काम, सुबक रंगकाम करण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात सध्या कारागिरांची उणीव भासत आहे. शेतीची कामे सुरू असल्याने मजूर नियमित येत नाहीत. मजुरीच्या दरात वाढ तसेच रंगाच्या दरातही वाढ झाल्याने बाप्पाच्या मूर्तीच्या दरावर परिणाम होणार आहे. यावर्षी बाप्पाच्या मूर्तीचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.गणपती बाप्पा सर्वांचा लाडका देव असल्याने भक्त त्याला विविध रूपामध्ये पाहणे पसंत करतात. मुंबईतला गणेशोत्सव सर्वांना भुरळ घालत असल्याने तेथील विविध आकारातील, रूपातील आकर्षक मूर्ती फोटोच्या स्वरूपात किंवा व्हाट्सअ‍ॅप, मोबाईलव्दारे फोटो पाठवून मूर्ती तयार करण्यास सांगण्यात येत आहे. प्रत्येकजण आपल्या आवडीच्या मूर्तींसाठी हट्ट धरत आहेत. 

गणेशोत्सवाला अजून दोन महिने असले तरी मूर्ती रेखाटण्याचे काम सुरू आहे. मूर्ती वाळल्यानंतरच रंगकाम करावे लागत असल्यामुळे मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. ग्राहक आपल्या आवडीनुसार मूर्ती रेखाटण्यास सांगतात. त्यामुळे मूर्ती तयार करण्यास अवधी लागतो. इंधन दरवाढीचा परिणाम माती, रंग दरावर झाला आहे. शिवाय मजुरीचे दरही वाढले असल्यामुळे साहजिकच मूर्तीच्या दरात वाढ होणार आहे.- सुशील कोतवडेकर, मूर्तिकार, रत्नागिरी. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरी