शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विरोधकांच्या पोटात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 21:42 IST

भास्कर जाधव : चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता शिबिर

गुहागर : जिल्ह्यात फूट पडली होती, याचा फायदा विरोधकांनी घेतला. आता एकत्र आलेला, एकसंघ झालेला राष्ट्रवादी पक्ष बघून विरोधकांच्या पोटात धडकी बसल्याशिवाय राहणार नाही, जिल्हा परिषदेबरोबरच पुढच्या वेळी खासदारही राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असा विश्वास आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. चिखली येथील ओंकार मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता शिबिर सांगता समारंभात ते बोलत होते. जाधव म्हणाले, २० वर्षांपूर्वी सेनेची लाट होती. पण, त्याआधी काँग्रेसची लाट होती हे विसरू नये. चांगले काम केले तर बदल होऊ शकतो. गुहागर व दापोलीमधून अशा प्रकारे घडवून आणलेला बदल तुमच्यासमोर आहे. माणसं बदलून पक्षाचं काम वाढलं नसतं. पुन्हा एकदा जुन्या कार्यकर्त्यांना साद घाला. त्यांच्या मनात विश्वास निर्माण केलात, तर सर्वत्र सत्ता येऊ शकते. दिलेला शब्द पाळणं, ही राजकारणातील माझी ताकद आहे. मागील निवडणुकीत पक्ष एकसंघ नव्हता, म्हणून खासदार आपल्या पक्षाचा होऊ शकला नाही. तानाजीराव चोरगे, बाबाजी जाधव, शेखर निकम हे सर्व माझ्याबरोबर असतील तर कोणालाही शह देऊ शकतो. रमेश कदमांची समजूत काढणं आपल्या समजुतीपलीकडचे असल्याचे ते म्हणाले. सचिव विनायक मुळे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, प्रांतिक सदस्य बाबाजी जाधव, विक्रांत जाधव, सिकंदर जसनाईक, नेत्रा ठाकूर, चित्रा ठाकूर, जयदेव मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विलास वाघे, सुनील जाधव, उपस्थित होते. (प्रतिनिधी) सुरक्षित मतदारसंघ : युवकांना प्राधान्य जिल्ह्यात गुहागर हा सुरक्षित मतदारसंघ म्हणून पाहिला जात आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी विद्यार्थी संघटनेच्या कामाचे कौतुक करुन आगामी काळात ७० टक्के युवकांना प्राधान्य द्या, असे सांगितले आहे. जिल्ह्यात पक्षाच्या सर्वाधिक आमदारांनी निवडणूक लढवावी, असे सुचित केले. बाप्पा सावंत यांनीही भाषणातून याला दुजोरा दिला. मात्र, यावर जाधव यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही.