शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू होणार, पण शिक्षकच नाहीत, शिकायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 12:40 IST

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या १,८०३ जागा रिक्त आहेत

लाेकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: नवीन शैक्षणिक वर्ष दि. १५ जूनपासून सुरू  होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, शाळांमध्ये शिकवायला शिक्षक कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न पालकांमधून केला जात आहे. शैक्षणिक सत्र सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र, तरीही जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक मिळत नसल्याची दयनीय स्थिती आहे. जिल्ह्यात सध्या १,८०३ जागा रिक्त आहेत.

जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी दाेन हजार ४९४ शाळांमध्ये प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शालेय परिसर सजावटीसह नवागतांचे स्वागत, प्रभातफेरी, पुस्तके वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी पहिलीच्या वर्गात १० हजार ९५२ विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत.  पहिली ते आठवीपर्यंतच्या ७३,३१० विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटपही होणार आहे. शाळांमध्ये विद्यार्थी स्वागताची लगबग सुरू असताना जिल्ह्यात १,८०३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर अध्यापन करण्यासाठी शिक्षक हवे आहेत. एक शिक्षक किती वर्गांची जबाबदारी पेलणार आहे?  

कोकणात शिक्षक रूजू झाल्यानंतर तीन-चार वर्षांच्या सेवेनंतर जिल्हा बदलीचे वेध लागतात. सातत्याने होणाऱ्या शिक्षकांच्या जिल्हा बदल्यांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता घसरत आहे. शिक्षकांची जिल्हा बदली थांबवून स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. गेल्या १५ वर्षांपासून डी.एड्, बी.एड् धारक करत आहेत. यासाठी डीएड्, बी.एड्धारकांनी उपोषणे, मोर्चे, आंदोलने केली. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचे आश्वासन दिले होते. दि. १५ जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून नवीन शिक्षक पहिल्या दिवशी शाळेत रूजू होतील, असेही आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप शाळांना शिक्षक मिळालेले नाहीत. 

भरती अर्धवट : डिसेंबर २०१७ सालची पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती अद्याप अर्धवट आहे. नवीन शिक्षक भरती करण्यासाठी फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घाईगडबडीत परीक्षा घेण्यात आली. निकाल लावायला महिना लागला, जून उजाडला तरी नियुक्ती दिलेली नाही.

परजिल्ह्यातील शिक्षकांच्या जिल्हा बदलीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही बाब गेल्या दहा वर्षांपासून शासनाच्या निदर्शनास आणून देत असूनही तोडगा निघालेला नाही. स्थानिकांना भरतीत प्राधान्य दिल्यास ही समस्या मार्गी लागेल.  - भालचंद्र दुर्गवळी

टॅग्स :Schoolशाळा