शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

शाळा सुरू होणार, पण शिक्षकच नाहीत, शिकायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 12:40 IST

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या १,८०३ जागा रिक्त आहेत

लाेकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: नवीन शैक्षणिक वर्ष दि. १५ जूनपासून सुरू  होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, शाळांमध्ये शिकवायला शिक्षक कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न पालकांमधून केला जात आहे. शैक्षणिक सत्र सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र, तरीही जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक मिळत नसल्याची दयनीय स्थिती आहे. जिल्ह्यात सध्या १,८०३ जागा रिक्त आहेत.

जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी दाेन हजार ४९४ शाळांमध्ये प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शालेय परिसर सजावटीसह नवागतांचे स्वागत, प्रभातफेरी, पुस्तके वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी पहिलीच्या वर्गात १० हजार ९५२ विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत.  पहिली ते आठवीपर्यंतच्या ७३,३१० विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटपही होणार आहे. शाळांमध्ये विद्यार्थी स्वागताची लगबग सुरू असताना जिल्ह्यात १,८०३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर अध्यापन करण्यासाठी शिक्षक हवे आहेत. एक शिक्षक किती वर्गांची जबाबदारी पेलणार आहे?  

कोकणात शिक्षक रूजू झाल्यानंतर तीन-चार वर्षांच्या सेवेनंतर जिल्हा बदलीचे वेध लागतात. सातत्याने होणाऱ्या शिक्षकांच्या जिल्हा बदल्यांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता घसरत आहे. शिक्षकांची जिल्हा बदली थांबवून स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. गेल्या १५ वर्षांपासून डी.एड्, बी.एड् धारक करत आहेत. यासाठी डीएड्, बी.एड्धारकांनी उपोषणे, मोर्चे, आंदोलने केली. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचे आश्वासन दिले होते. दि. १५ जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून नवीन शिक्षक पहिल्या दिवशी शाळेत रूजू होतील, असेही आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप शाळांना शिक्षक मिळालेले नाहीत. 

भरती अर्धवट : डिसेंबर २०१७ सालची पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती अद्याप अर्धवट आहे. नवीन शिक्षक भरती करण्यासाठी फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घाईगडबडीत परीक्षा घेण्यात आली. निकाल लावायला महिना लागला, जून उजाडला तरी नियुक्ती दिलेली नाही.

परजिल्ह्यातील शिक्षकांच्या जिल्हा बदलीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही बाब गेल्या दहा वर्षांपासून शासनाच्या निदर्शनास आणून देत असूनही तोडगा निघालेला नाही. स्थानिकांना भरतीत प्राधान्य दिल्यास ही समस्या मार्गी लागेल.  - भालचंद्र दुर्गवळी

टॅग्स :Schoolशाळा