शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

चिवेली पाणी योजनेत अखेर ३२ लाखांचा घोळ उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 17:55 IST

पाणी योजनेतील सुमारे ३२ लाखांची कामे जागेवर आढळून आली नसल्याचे मत तांत्रिक समितीने या अहवालात म्हटले आहे.

चिपळूण : तालुक्यातील चिवेली येथे आठ वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेत लाखोंचा घोळ झालेला आहे. योजनेतील अनियमिततेबाबत लोकांच्या तक्रारींमुळे स्थापन झालेल्या तांत्रिक समितीने आपला तपासणी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार पाणी योजनेतील सुमारे ३२ लाखांची कामे जागेवर आढळून आली नसल्याचे मत तांत्रिक समितीने या अहवालात म्हटले आहे. तालुक्यातील बोरगावपाठोपाठ आता चिवेलीतही सर्वात मोठा घोळ असल्याचे उघड झाले आहे.

चिवेली येथे आठ वर्षांपूर्वी नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती. या योजनेसाठी सुमारे ४८ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र, योजनेतील कामे अंदाजपत्रकाप्रमाणे झाली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे पाणी योजनेच्या तपासणीसाठी तांत्रिक समितीची स्थापना करण्यात आली. अंदाजपत्रकाप्रमाणे कामे झाली आहेत का, मूल्यांकनानुसार जागेवर काम आहे का, याची तपासणी या समितीने केली. या तपासणीचा अहवाल पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता तसेच तत्कालीन कार्यकारी अभियंता वृषभ उपाध्ये यांनी दिला आहे. त्यानुसार या योजनेत ३२ लाखाचा घोळ असल्याचे उजेडात आले आहे.

तांत्रिक समितीने दिलेल्या अहवालानुसार न केलेल्या कामांमध्ये विहिरीची दुरुस्ती करणे ९६ हजार ९५१.६९ रुपये, पंप हाऊस दुरूस्ती करणे २१ हजार ६१७.६४ रुपये, उर्ध्ववाहिनी १ लाख ७३ हजार ७९३ रुपये, साठवण टाकीची दुरूस्ती ३४ हजार २६०.५३ रुपये, वितरण वाहिनी २६ लाख ३३ हजार ८७९.३७ रुपये, चाचणी व परिचालन १ लाख ९४ हजार २८८ रुपये असे एकूण ३१ लाख ५४ हजार ७९०.२३ रुपयांचा घोळ चौकशीत आढळला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून चिवेलीत सुमारे १८ ते २० वर्षांपूर्वी पाणी योजना राबविण्यात आली होती. १० वर्षांनंतर या योजनेच्या दुरुस्तीसाठी जलवाहिनीसह विविध कामे करण्यासाठी ४८ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात नवीन योजनेत जलवाहिनी टाकण्यात आली नाही. पूर्वीची जलवाहिनी तशीच ठेवून नवीन योजनेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप मुबीन महालदार, सिध्देश शिर्के, सागर शिर्के आदींसह ग्रामस्थांनी केला होता. या योजनेची वर्षभर चौकशी सुरू आहे. कामे अपूर्ण असताना, लाखोंचा घोळ असताना संबंधितांवर कारवाई होत नसल्याने तक्रारदारांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली होती. आता तांत्रिक समितीनेच पाणी योजनेत पाणी मुरल्याचा ठपका ठेवला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी