शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

चिवेली पाणी योजनेत अखेर ३२ लाखांचा घोळ उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 17:55 IST

पाणी योजनेतील सुमारे ३२ लाखांची कामे जागेवर आढळून आली नसल्याचे मत तांत्रिक समितीने या अहवालात म्हटले आहे.

चिपळूण : तालुक्यातील चिवेली येथे आठ वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेत लाखोंचा घोळ झालेला आहे. योजनेतील अनियमिततेबाबत लोकांच्या तक्रारींमुळे स्थापन झालेल्या तांत्रिक समितीने आपला तपासणी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार पाणी योजनेतील सुमारे ३२ लाखांची कामे जागेवर आढळून आली नसल्याचे मत तांत्रिक समितीने या अहवालात म्हटले आहे. तालुक्यातील बोरगावपाठोपाठ आता चिवेलीतही सर्वात मोठा घोळ असल्याचे उघड झाले आहे.

चिवेली येथे आठ वर्षांपूर्वी नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती. या योजनेसाठी सुमारे ४८ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र, योजनेतील कामे अंदाजपत्रकाप्रमाणे झाली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे पाणी योजनेच्या तपासणीसाठी तांत्रिक समितीची स्थापना करण्यात आली. अंदाजपत्रकाप्रमाणे कामे झाली आहेत का, मूल्यांकनानुसार जागेवर काम आहे का, याची तपासणी या समितीने केली. या तपासणीचा अहवाल पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता तसेच तत्कालीन कार्यकारी अभियंता वृषभ उपाध्ये यांनी दिला आहे. त्यानुसार या योजनेत ३२ लाखाचा घोळ असल्याचे उजेडात आले आहे.

तांत्रिक समितीने दिलेल्या अहवालानुसार न केलेल्या कामांमध्ये विहिरीची दुरुस्ती करणे ९६ हजार ९५१.६९ रुपये, पंप हाऊस दुरूस्ती करणे २१ हजार ६१७.६४ रुपये, उर्ध्ववाहिनी १ लाख ७३ हजार ७९३ रुपये, साठवण टाकीची दुरूस्ती ३४ हजार २६०.५३ रुपये, वितरण वाहिनी २६ लाख ३३ हजार ८७९.३७ रुपये, चाचणी व परिचालन १ लाख ९४ हजार २८८ रुपये असे एकूण ३१ लाख ५४ हजार ७९०.२३ रुपयांचा घोळ चौकशीत आढळला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून चिवेलीत सुमारे १८ ते २० वर्षांपूर्वी पाणी योजना राबविण्यात आली होती. १० वर्षांनंतर या योजनेच्या दुरुस्तीसाठी जलवाहिनीसह विविध कामे करण्यासाठी ४८ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात नवीन योजनेत जलवाहिनी टाकण्यात आली नाही. पूर्वीची जलवाहिनी तशीच ठेवून नवीन योजनेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप मुबीन महालदार, सिध्देश शिर्के, सागर शिर्के आदींसह ग्रामस्थांनी केला होता. या योजनेची वर्षभर चौकशी सुरू आहे. कामे अपूर्ण असताना, लाखोंचा घोळ असताना संबंधितांवर कारवाई होत नसल्याने तक्रारदारांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली होती. आता तांत्रिक समितीनेच पाणी योजनेत पाणी मुरल्याचा ठपका ठेवला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी