शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

चिवेली पाणी योजनेत अखेर ३२ लाखांचा घोळ उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 17:55 IST

पाणी योजनेतील सुमारे ३२ लाखांची कामे जागेवर आढळून आली नसल्याचे मत तांत्रिक समितीने या अहवालात म्हटले आहे.

चिपळूण : तालुक्यातील चिवेली येथे आठ वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेत लाखोंचा घोळ झालेला आहे. योजनेतील अनियमिततेबाबत लोकांच्या तक्रारींमुळे स्थापन झालेल्या तांत्रिक समितीने आपला तपासणी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार पाणी योजनेतील सुमारे ३२ लाखांची कामे जागेवर आढळून आली नसल्याचे मत तांत्रिक समितीने या अहवालात म्हटले आहे. तालुक्यातील बोरगावपाठोपाठ आता चिवेलीतही सर्वात मोठा घोळ असल्याचे उघड झाले आहे.

चिवेली येथे आठ वर्षांपूर्वी नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती. या योजनेसाठी सुमारे ४८ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र, योजनेतील कामे अंदाजपत्रकाप्रमाणे झाली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे पाणी योजनेच्या तपासणीसाठी तांत्रिक समितीची स्थापना करण्यात आली. अंदाजपत्रकाप्रमाणे कामे झाली आहेत का, मूल्यांकनानुसार जागेवर काम आहे का, याची तपासणी या समितीने केली. या तपासणीचा अहवाल पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता तसेच तत्कालीन कार्यकारी अभियंता वृषभ उपाध्ये यांनी दिला आहे. त्यानुसार या योजनेत ३२ लाखाचा घोळ असल्याचे उजेडात आले आहे.

तांत्रिक समितीने दिलेल्या अहवालानुसार न केलेल्या कामांमध्ये विहिरीची दुरुस्ती करणे ९६ हजार ९५१.६९ रुपये, पंप हाऊस दुरूस्ती करणे २१ हजार ६१७.६४ रुपये, उर्ध्ववाहिनी १ लाख ७३ हजार ७९३ रुपये, साठवण टाकीची दुरूस्ती ३४ हजार २६०.५३ रुपये, वितरण वाहिनी २६ लाख ३३ हजार ८७९.३७ रुपये, चाचणी व परिचालन १ लाख ९४ हजार २८८ रुपये असे एकूण ३१ लाख ५४ हजार ७९०.२३ रुपयांचा घोळ चौकशीत आढळला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून चिवेलीत सुमारे १८ ते २० वर्षांपूर्वी पाणी योजना राबविण्यात आली होती. १० वर्षांनंतर या योजनेच्या दुरुस्तीसाठी जलवाहिनीसह विविध कामे करण्यासाठी ४८ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात नवीन योजनेत जलवाहिनी टाकण्यात आली नाही. पूर्वीची जलवाहिनी तशीच ठेवून नवीन योजनेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप मुबीन महालदार, सिध्देश शिर्के, सागर शिर्के आदींसह ग्रामस्थांनी केला होता. या योजनेची वर्षभर चौकशी सुरू आहे. कामे अपूर्ण असताना, लाखोंचा घोळ असताना संबंधितांवर कारवाई होत नसल्याने तक्रारदारांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली होती. आता तांत्रिक समितीनेच पाणी योजनेत पाणी मुरल्याचा ठपका ठेवला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी