शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची, रत्नागिरीत संयुक्त सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:46 IST

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी साध्य करता येईल, यासाठी सर्व संबंधीत घटकांमध्ये समन्वय निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.

ठळक मुद्देशालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची, रत्नागिरीत संयुक्त सभा सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीबाबत अनेकांच्या सूचना

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी साध्य करता येईल, यासाठी सर्व संबंधीत घटकांमध्ये समन्वय निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये पालक, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहनधारक, संबंधित शाळा, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलीस यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे, असे मत रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.शाळांमध्ये विद्यार्थी वाहतूक करतानाच्या सुरक्षिततेबाबत पालक, विद्यार्थी वाहतूक संघटनांचे पदाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालव व वाहतूक पोलीस अशी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी व्यासपीठावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते, वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.रत्नागिरी शहरात मान्यवर शिक्षण संस्थांच्या अनेक शाळा आहेत. सरकारी शाळाही आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या मोठी आहे. हे विद्यार्थी विविध खासगी वाहने, शाळांची वाहने याद्वारे घराहून शाळेत आणि शाळेतून परत घराकडे येतात. मात्र, विद्यार्थी वाहतुकीसाठी जिल्ह्यात, रत्नागिरी शहरात पुरेशी वाहने उपलब्ध नाहीत. तसेच अनेक पालकांना खासगी वाहनांचा खर्चही परवडत नसल्याचे सांगितले जाते.त्यामुळे कमी पैशात विद्यार्थ्यांना शाळेत नेणारे व सुखरूप घरी आणणाऱ्या वाहनांच्या शोधात पालक असतात. अशावेळी क्षमतेपेक्षा अधिक मुले वाहनांमध्ये बसवली जातात. त्यामुळे अपघाताची भीती असते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची बनली आहे. संबंधित सर्व घटकांमध्ये समन्वय असल्यास शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता चांगल्या प्रकारे राखता येईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.स्कूलबस घेणे अवघडविद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. त्यांनी या वाहतुकीसाठी नोंदणीही केली आहे. मात्र, सुरक्षित विद्यार्थी प्रवासासाठी रिक्षाधारकांनी स्कूल बसचा पर्याय स्वीकारावा, यासाठी वाहतूक यंत्रणेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, सर्वच रिक्षाचालकांना स्कूलबसचा पर्याय मानवणारा नाही. बॅँकांचे सहकार्य त्यासाठी मिळवताना दमछाक होते. ज्यांना शक्य आहे ते हा पर्याय स्वीकारतील, असे विचार यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले.ताळमेळच नाही : विभुतेरत्नागिरी शहरातील विद्यार्थी वाहतुकीचा आढावा घेतला तर विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, शाळा व पालक यांच्यात कोणताही ताळमेळ नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. विद्यार्थी वाहतूक करणारी खासगी वाहने किती? याची आकडेवारी नाही. खासगी वाहनांची जबाबदारी घेण्यास शाळा तयार नाहीत. त्यांना गाड्या वळविण्यास शाळेच्या जागेचा वापर करू देण्यासही नकार मिळतो. ही स्थिती बदलण्याची गरज आहे, असे मत वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Schoolशाळाeducationशैक्षणिकRatnagiriरत्नागिरी