शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची, रत्नागिरीत संयुक्त सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:46 IST

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी साध्य करता येईल, यासाठी सर्व संबंधीत घटकांमध्ये समन्वय निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.

ठळक मुद्देशालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची, रत्नागिरीत संयुक्त सभा सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीबाबत अनेकांच्या सूचना

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी साध्य करता येईल, यासाठी सर्व संबंधीत घटकांमध्ये समन्वय निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये पालक, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहनधारक, संबंधित शाळा, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलीस यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे, असे मत रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.शाळांमध्ये विद्यार्थी वाहतूक करतानाच्या सुरक्षिततेबाबत पालक, विद्यार्थी वाहतूक संघटनांचे पदाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालव व वाहतूक पोलीस अशी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी व्यासपीठावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते, वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.रत्नागिरी शहरात मान्यवर शिक्षण संस्थांच्या अनेक शाळा आहेत. सरकारी शाळाही आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या मोठी आहे. हे विद्यार्थी विविध खासगी वाहने, शाळांची वाहने याद्वारे घराहून शाळेत आणि शाळेतून परत घराकडे येतात. मात्र, विद्यार्थी वाहतुकीसाठी जिल्ह्यात, रत्नागिरी शहरात पुरेशी वाहने उपलब्ध नाहीत. तसेच अनेक पालकांना खासगी वाहनांचा खर्चही परवडत नसल्याचे सांगितले जाते.त्यामुळे कमी पैशात विद्यार्थ्यांना शाळेत नेणारे व सुखरूप घरी आणणाऱ्या वाहनांच्या शोधात पालक असतात. अशावेळी क्षमतेपेक्षा अधिक मुले वाहनांमध्ये बसवली जातात. त्यामुळे अपघाताची भीती असते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची बनली आहे. संबंधित सर्व घटकांमध्ये समन्वय असल्यास शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता चांगल्या प्रकारे राखता येईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.स्कूलबस घेणे अवघडविद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. त्यांनी या वाहतुकीसाठी नोंदणीही केली आहे. मात्र, सुरक्षित विद्यार्थी प्रवासासाठी रिक्षाधारकांनी स्कूल बसचा पर्याय स्वीकारावा, यासाठी वाहतूक यंत्रणेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, सर्वच रिक्षाचालकांना स्कूलबसचा पर्याय मानवणारा नाही. बॅँकांचे सहकार्य त्यासाठी मिळवताना दमछाक होते. ज्यांना शक्य आहे ते हा पर्याय स्वीकारतील, असे विचार यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले.ताळमेळच नाही : विभुतेरत्नागिरी शहरातील विद्यार्थी वाहतुकीचा आढावा घेतला तर विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, शाळा व पालक यांच्यात कोणताही ताळमेळ नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. विद्यार्थी वाहतूक करणारी खासगी वाहने किती? याची आकडेवारी नाही. खासगी वाहनांची जबाबदारी घेण्यास शाळा तयार नाहीत. त्यांना गाड्या वळविण्यास शाळेच्या जागेचा वापर करू देण्यासही नकार मिळतो. ही स्थिती बदलण्याची गरज आहे, असे मत वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Schoolशाळाeducationशैक्षणिकRatnagiriरत्नागिरी