शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

एस. टी.ची हंगामी भाडेवाढ १ पासून, सर्व गाड्यांचा प्रवास महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 12:39 IST

दीपावलीच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी बऱ्यापैकी असते. एस. टी.ला होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी वीस दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ करण्यात येणार असून दि. १ ते २० नोव्हेंबर अखेर दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २१ नोव्हेबरपासून भाडेवाढ आकारली जाणार आहे.

ठळक मुद्देसाधी, मिडी, सलद, निमआराम, रातराणी, शिवशाही वातानुकूलित सर्व गाड्यांचा प्रवास महागवीस दिवसांची हंगामी भाडेवाढ, दिनांक २१पासून तिकीटदर होणार पूर्ववतशिवशाही वातानुकूलित (शयनयान) दरवाढीतून वगळण्यात आली

रत्नागिरी : दीपावलीच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी बऱ्यापैकी असते. एस. टी.ला होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी वीस दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ करण्यात येणार असून दि. १ ते २० नोव्हेंबर अखेर दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २१ नोव्हेबरपासून भाडेवाढ आकारली जाणार आहे.रत्नागिरी विभागाचे महिन्याचे उत्पन्न ३० कोटीच्या घरात आहे. वीस दिवसातील भाडेवाढीमुळे उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ होणार आहे. साध्या, मिडी व जलद गाडीसाठी प्रतिस्टेज ७ रूपये ४५ पैसे दर आकारण्यात येतो. भाडेवाढीनंतर हा दर ८ रूपये २० पैसे होणार आहे.

रातराणी गाडीसाठी प्रतिस्टेज ८ रूपये ८० पैसे दर आहे तो ९ रूपये ७० पैसे होणार आहे. निमआराम गाडीसाठी प्रतिस्टेज १० रूपये १० पैसे दर आहे तो ११ रूपये १० पैसे होणार आहे. वातानुकूलित बससाठी ८ रूपये ६० पैसे असलेला दर ९ रूपये ९० पैसे होणार आहे.

वातानुकूलित शिवशाही (आसनी) १० रूपये ५५ पैसे ऐवजी ११ रूपये ६० रूपये होणार आहे. वातानुकूलित शिवशाही (शयनी) साठी प्रतिस्टेज १५ रूपये २० पैसे दर आहे. मात्र दरवाढ न केल्याने तेच दर राहणार आहेत.इंधनाच्या दरातील चढ-उतार विचारात घेता महामंडळाकडून वारंवार तिकीट दरात वाढ केली जात नाही. दिवाळीच्या सुट्टीत सहल व पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. तोटा भरून काढण्यासाठी गतवर्षी हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती.

दिवाळी सणातील सलग चौथ्या वर्षी वाढ केली जाणार आहे. महामंडळाने १ ते २० नोव्हेंबर अखेर हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीचा हंगाम संपल्यानंतर २० च्या मध्यरात्री पासून पुन्हा मूळ प्रतिटप्पा दराने भाडे पूर्ववत करण्यात येणार आहे.एसटीतून प्रवास करणाऱ्यांमध्ये पासधारकांची संख्याही लक्षणीय आहे. मासिक, त्रैमासिक पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हंगामी तिकीटवाढ लागू केली जाणार नाही. मूळ रकमेच्या प्रवासातूनच प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक प्रवास करु शकतात. केवळ रोखीने किंवा तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना हंगामी तिकीटवाढ लागू केली जाणार आहे. त्यामुळे पासधारकांना दिलासा मिळाला आहे.राज्य परिवहन महामंडळाने हंगामी तिकीट दरवाढ एकाचवेळी राज्यात जाहीर केली आहे. सर्वत्र दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अंमलबजावणी देखील एकाच दिवसापासून सुरू होणार आहे. वीस दिवसाच्या हंगामी भाडेवाढीनंतर पुन्हा पूर्ववत दर ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे दि.२१ नोव्हेंबरपासून जुने तिकीटदर होणार आहेत.हंगामी भाडेवाढीचे चौथे वर्षराज्य मार्ग परिवहन महामंडळाला लवचिक भाडेवाढीबरोबरच कमी करण्याचाही अधिकार आहे. इंधनाच्या दरातील चढ-उतार विचारात घेता महामंडळाने तिकीट दर स्थिर ठेवले असले तरी दरवर्षी दिवाळीत हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर्षी दिवाळीतील हंगामी तिकीटवाढीचे चौथे वर्ष आहे. महामंडळाने २०१५ मध्ये दिवाळीच्या सु्टीत पहिल्यांदा हंगामी भाडेवाढ केली होती. त्यानंतर २२ आॅक्टोबर ते १४ नोव्हेंबर (२०१६) पर्यंत चार टप्प्यात भाडेवाढ लागू केली होती. गतवर्षी दि. १४ ते ३१ आॅक्टोबर (२०१७) अखेर भाडेवाढ केली होती.भाडेवाढीवर मर्यादा२२ आॅगस्ट २०१४ रोजी नियमित भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजनेची अंमलबजावणी १ एप्रिल २०१६ च्या मध्यरात्रीपासून सुरू झाली. या योजनेतंर्गत प्रत्येक तिकिटधारी प्रवाशाकडून एक रुपया शुल्क आकारले जाते. यावर्षी दि.१५ जून २०१८च्या मध्यरात्री १८ टक्के भाडे वाढ करण्यात आली.दहा टक्के भाडेवाढयावर्षी दिवाळीतील हंगामी भाडेवाढ करताना सर्वप्रकारच्या एस. टी. गाड्यांतील प्रवासाचे तिकीटदर दहा टक्क्याने वाढविण्यात आले आहेत. प्रतिस्टेज तिकीटदरात वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी