शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

एस. टी.ची हंगामी भाडेवाढ १ पासून, सर्व गाड्यांचा प्रवास महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 12:39 IST

दीपावलीच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी बऱ्यापैकी असते. एस. टी.ला होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी वीस दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ करण्यात येणार असून दि. १ ते २० नोव्हेंबर अखेर दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २१ नोव्हेबरपासून भाडेवाढ आकारली जाणार आहे.

ठळक मुद्देसाधी, मिडी, सलद, निमआराम, रातराणी, शिवशाही वातानुकूलित सर्व गाड्यांचा प्रवास महागवीस दिवसांची हंगामी भाडेवाढ, दिनांक २१पासून तिकीटदर होणार पूर्ववतशिवशाही वातानुकूलित (शयनयान) दरवाढीतून वगळण्यात आली

रत्नागिरी : दीपावलीच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी बऱ्यापैकी असते. एस. टी.ला होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी वीस दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ करण्यात येणार असून दि. १ ते २० नोव्हेंबर अखेर दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २१ नोव्हेबरपासून भाडेवाढ आकारली जाणार आहे.रत्नागिरी विभागाचे महिन्याचे उत्पन्न ३० कोटीच्या घरात आहे. वीस दिवसातील भाडेवाढीमुळे उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ होणार आहे. साध्या, मिडी व जलद गाडीसाठी प्रतिस्टेज ७ रूपये ४५ पैसे दर आकारण्यात येतो. भाडेवाढीनंतर हा दर ८ रूपये २० पैसे होणार आहे.

रातराणी गाडीसाठी प्रतिस्टेज ८ रूपये ८० पैसे दर आहे तो ९ रूपये ७० पैसे होणार आहे. निमआराम गाडीसाठी प्रतिस्टेज १० रूपये १० पैसे दर आहे तो ११ रूपये १० पैसे होणार आहे. वातानुकूलित बससाठी ८ रूपये ६० पैसे असलेला दर ९ रूपये ९० पैसे होणार आहे.

वातानुकूलित शिवशाही (आसनी) १० रूपये ५५ पैसे ऐवजी ११ रूपये ६० रूपये होणार आहे. वातानुकूलित शिवशाही (शयनी) साठी प्रतिस्टेज १५ रूपये २० पैसे दर आहे. मात्र दरवाढ न केल्याने तेच दर राहणार आहेत.इंधनाच्या दरातील चढ-उतार विचारात घेता महामंडळाकडून वारंवार तिकीट दरात वाढ केली जात नाही. दिवाळीच्या सुट्टीत सहल व पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. तोटा भरून काढण्यासाठी गतवर्षी हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती.

दिवाळी सणातील सलग चौथ्या वर्षी वाढ केली जाणार आहे. महामंडळाने १ ते २० नोव्हेंबर अखेर हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीचा हंगाम संपल्यानंतर २० च्या मध्यरात्री पासून पुन्हा मूळ प्रतिटप्पा दराने भाडे पूर्ववत करण्यात येणार आहे.एसटीतून प्रवास करणाऱ्यांमध्ये पासधारकांची संख्याही लक्षणीय आहे. मासिक, त्रैमासिक पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हंगामी तिकीटवाढ लागू केली जाणार नाही. मूळ रकमेच्या प्रवासातूनच प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक प्रवास करु शकतात. केवळ रोखीने किंवा तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना हंगामी तिकीटवाढ लागू केली जाणार आहे. त्यामुळे पासधारकांना दिलासा मिळाला आहे.राज्य परिवहन महामंडळाने हंगामी तिकीट दरवाढ एकाचवेळी राज्यात जाहीर केली आहे. सर्वत्र दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अंमलबजावणी देखील एकाच दिवसापासून सुरू होणार आहे. वीस दिवसाच्या हंगामी भाडेवाढीनंतर पुन्हा पूर्ववत दर ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे दि.२१ नोव्हेंबरपासून जुने तिकीटदर होणार आहेत.हंगामी भाडेवाढीचे चौथे वर्षराज्य मार्ग परिवहन महामंडळाला लवचिक भाडेवाढीबरोबरच कमी करण्याचाही अधिकार आहे. इंधनाच्या दरातील चढ-उतार विचारात घेता महामंडळाने तिकीट दर स्थिर ठेवले असले तरी दरवर्षी दिवाळीत हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर्षी दिवाळीतील हंगामी तिकीटवाढीचे चौथे वर्ष आहे. महामंडळाने २०१५ मध्ये दिवाळीच्या सु्टीत पहिल्यांदा हंगामी भाडेवाढ केली होती. त्यानंतर २२ आॅक्टोबर ते १४ नोव्हेंबर (२०१६) पर्यंत चार टप्प्यात भाडेवाढ लागू केली होती. गतवर्षी दि. १४ ते ३१ आॅक्टोबर (२०१७) अखेर भाडेवाढ केली होती.भाडेवाढीवर मर्यादा२२ आॅगस्ट २०१४ रोजी नियमित भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजनेची अंमलबजावणी १ एप्रिल २०१६ च्या मध्यरात्रीपासून सुरू झाली. या योजनेतंर्गत प्रत्येक तिकिटधारी प्रवाशाकडून एक रुपया शुल्क आकारले जाते. यावर्षी दि.१५ जून २०१८च्या मध्यरात्री १८ टक्के भाडे वाढ करण्यात आली.दहा टक्के भाडेवाढयावर्षी दिवाळीतील हंगामी भाडेवाढ करताना सर्वप्रकारच्या एस. टी. गाड्यांतील प्रवासाचे तिकीटदर दहा टक्क्याने वाढविण्यात आले आहेत. प्रतिस्टेज तिकीटदरात वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी