शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Russia-Ukraine crisis: रत्नागिरी जिल्ह्यातील ८ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 18:07 IST

या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रशासनाने परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती दिली आहे

रत्नागिरी : रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु असल्याने युक्रेनमध्ये गेलेल्या भारतीयांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ८ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांशी पालकांनी संपर्क साधला असून, ते सर्व सुखरुप असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या नातेवाईंकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रशासनाने परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती दिली आहे.युक्रेनमध्ये अडकलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील तीन तर चिपळूण, मंडणगड, रत्नागिरी, लांजा व दापोली तालुक्यातील एक अशा एकूण आठ विद्यार्थ्यांचा  समावेश आहे. यातील सहाजण एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला, एक विद्यार्थिनी दुसऱ्या वर्षाला तर एक विद्यार्थी तृतील वर्षाला शिक्षण घेत आहे.या विद्यार्थ्यांमध्ये देवरुखातील अद्वैत विनोद कदम, साक्षी प्रकाश नरोटे, जान्हवी उमाकांत शिंदे, चिपळूण येथील वृक्षभनाथ राजेंद्र मोलाज, मंडणगडमधील आकाश अनंत कोबनाक, रत्नागिरीतील मिरकरवाडा येथील मुस्कान मन्सुर सोलकर, लांजातील सलोनी साजीद मनेर आणि दापाेलीची ऐश्वर्या मंगेश सावंत यांचा समावेश आहे.युद्ध परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती पालकांनी प्रशासनाला दिली आहे. परंतु, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशी आणावे, अशी विनंती पालकांनी प्रशासनाकडे केली आहे.जिल्हा प्रशासन याबाबत परराष्ट्र विभागाशी संपर्कात आहे. परराष्ट्र खात्याकडून विद्यार्थी व नोकरीनिमित्ताने असणार्‍या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थी लवकरच मायदेशी परततील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाStudentविद्यार्थीIndiaभारत