जीवाची बाजी लावून ‘त्यां’नी जाेपासले मदतीचे व्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST2021-07-20T04:22:05+5:302021-07-20T04:22:05+5:30

सचिन मोहिते / देवरुख : आपण माणूस म्हणून जन्माला आलोय तर माणसांसाठी मदतीला आलो पाहिजे ही भावना मनात कायम ...

At the risk of their lives, they vowed to help | जीवाची बाजी लावून ‘त्यां’नी जाेपासले मदतीचे व्रत

जीवाची बाजी लावून ‘त्यां’नी जाेपासले मदतीचे व्रत

सचिन मोहिते / देवरुख : आपण माणूस म्हणून जन्माला आलोय तर माणसांसाठी मदतीला आलो पाहिजे ही भावना मनात कायम ठेवून अडीअडचणीत असलेल्यांना मदत करण्याचे काम निवळी - बावनदीतील बाैद्धवाडी येथील रमेश सावंत यांनी सुरू ठेवले आहे. गेली २५ वर्षे ते जीवाची बाजी लावून मदत करण्याचे व्रत त्यांनी जाेपासले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन देवरूख पाेलिसांनी त्यांचे काैतुकही केले.

तळेकांटे येथे गीते नामक व्यक्तीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी मदत केले आणि रमेश सावंत हे नाव सर्वांसमाेर आले. काेणतीही अपेक्षा न ठेवता आणि हातात ग्लोज नाही की तोंडाला मास्क नाही तर कधी खोल पाण्यात उतरण्याची वेळ आली तर ऑक्सिजनदेखील न वापरता मदत कार्यासाठी रमेश सावंत पुढे असतात. बावनदी पंचक्रोशीतील निवळी, तळेकांटे, करबुडे या गावातील तरुण नेहमीच मदत कार्यात पुढे असतात. सावंत आणि त्यांचा ग्रुप हा नदीकाठचा असल्याने त्यांना पूर हा विषय तसा नवीन नाही. त्यामुळे कितीही पाण्यातून कसे तरुन जायचे याचे कौशल्य रमेश यांना आहे. त्यांनी आपल्या पंचक्रोशीतील अनेक तरुणांना पोहण्याच्या प्रकार तसेच पाण्याचा प्रभाव-प्रवाह कसा ओळखायचा आणि आपली पोहण्याची चाल कशी ठेवायची याचे ते तरुणांना प्रशिक्षण देतात.

पूल नसताना चाकरमान्यांना सुमारे पाचशे फूट लांब नदी पत्रातून त्यांना पाठीवरून ने-आण करण्याचे काम ते करत हाेते. नदीपात्र पूर्ण भरलेले असतानाही त्यात बिनधास्तपणे उतरून मदत करण्याची सचाेटी त्यांच्याकडे आहे. एखाद्या धरणाला गळती लागल्यास त्या धरणाच्या तळाशी उतरून ते स्वतः ती गळती थांबवतात. आजपर्यंत लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी, निवळी अशा अनेक ठिकाणी आपत्कालीन स्थितीत नेहमी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन देवरूख पाेलीस स्थानकाचे पाेलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी रमेश सावंत यांच्यासह संजू सावंत, रामदास सावंत, प्रमाेद खापरे यांचा सत्कार करण्यात आला.

-----------------------

आम्ही हार तुरे गुलाबाच्या फुलांसाठी काम करत नाही; मात्र थाप उभारी देते. जेव्हा आम्हाला एखादी घटना कळते आणि आम्ही तिथे जातो तेव्हा स्थानिक पोलीस आम्हाला पुढे पाठवत नाही. मग त्या ठिकाणी जाऊन कधी कधी त्यांना आम्हाला माहिती आहे, अशी कामे आम्ही करतो. त्यामुळे मदत करण्यासाठी आम्हाला तसे ओळखपत्र मिळाले तर अशी वेळ येणार नाही.

- रमेश सावंत

190721\img-20210719-wa0047.jpg

स्पर्शच्या चौथ्या फिरत्या वैद्यकीय पथकाचे आरोग्य सेवेला बळकटी – आ.ज्ञानराज चौगुले

Web Title: At the risk of their lives, they vowed to help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.