शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीने थरकाप उडाला!, ऋषभनाथने सांगितली तेथील भीषण परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:01 IST

भारतीय दूतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचा निर्णय झाल्यावर चिंता काहीशी मिटली.

संदीप बांद्रे

 

 

चिपळूण : युरोपचे हृदय मानल्या जाणाऱ्या युक्रेनवर ताबा मिळण्यासाठी रशियाकडून अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यावेळी अचानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि तितक्याच तातडीने रशियाने हल्ला करण्यास सुरवात केली. जशी जशी हल्ल्याची भीषणता वाढत होती, तशी आमची धाकधूक वाढत होती. आपण शिकत असलेली उजक्रोड इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी युक्रेनमध्येच हंगेरी सीमेलगत असल्याने तिथे फारसा धोका नव्हता. तरीही काही क्षण अक्षरशः थरकाप उडवणारे होते, असा अनुभव युक्रेनमधून आपल्या घरी, खेर्डी (चिपळूण) येथील पतरलेल्या ऋषभनाथ मोळाज याने मांडला.

वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेला ऋषभनाथ मंगळवारी चिपळुणात दाखल झाला. लोकमतशी बोलताना तो म्हणाला, युक्रेन-रशियाचे वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. युक्रेनचा विकास दर रशियाच्या कितीतरी पटीने अधिक असून, तो विकसित देश आहे. २२ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ले सुरू झाले. विमानतळ, रेल्वेस्थानक तसेच तेथील राष्ट्रीय प्रकल्पांवर बॉम्बहल्ले झाले. त्यामुळे धाकधूक वाढली. त्यावेळी आमच्या परिसरात सायरन वाजवून कर्फ्यू लावण्यात आला. मात्र हे हल्ले ३०० किलोमीटरवर होत असल्याने आम्ही सुरक्षित होतो. विद्यापीठापासून २० किमीवर हंगेरीची सीमा होती. त्यामुळे धोका वाढल्यानंतर शेजारच्या हंगेरी देशात त्वरित स्थलांतराचे नियोजन विद्यापीठाने केले होते. ऐनवेळी हल्ला झाल्यास बंकरमध्ये राहण्याचीही व्यवस्था होती. तिथे असतानाच तीन दिवस संचारबंदी होती.

दरम्यान, भारतीय दूतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचा निर्णय झाल्यावर चिंता काहीशी मिटली. कुटुंबीय आणि नातेवाईक सारखे संपर्कात असायचे. वास्तव्याच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी असल्याने फारशी अडचण झाली नाही. भारतीय दूतावासाकडून आम्हाला सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले. परतीचा प्रवास उजक्रोड, बुडापेस्ट, हंगेरीमार्गे दिल्लीपर्यंत झाला. दिल्लीत विश्रांती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीतून मुंबई व मुंबईतून चिपळूणला मंगळवारी पहाटे ५ वाजता पोहोचलो. घरी आल्यावर आईवडिलांना खूप समाधान वाटले, असे त्याने सांगितले.

मुळात युक्रेनमध्येही विद्यापीठाने भारतीय विद्यार्थ्यासह सर्व विद्यार्थ्यांचीच काळजी घेतली होती. भारतीय दूतावासाचे मोठे सहकार्य लाभल्याने आम्ही सुरक्षित घरी पोहचलो असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली. युक्रेनची परिस्थिती सुधारल्यास पुन्हा जाणार असल्याचेही त्याने सांगितले. मुलगा घरी सुखरूप परतल्याने ऋषभनाथच्या आई, वडील व बहिणीच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाStudentविद्यार्थी