शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीने थरकाप उडाला!, ऋषभनाथने सांगितली तेथील भीषण परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:01 IST

भारतीय दूतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचा निर्णय झाल्यावर चिंता काहीशी मिटली.

संदीप बांद्रे

 

 

चिपळूण : युरोपचे हृदय मानल्या जाणाऱ्या युक्रेनवर ताबा मिळण्यासाठी रशियाकडून अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यावेळी अचानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि तितक्याच तातडीने रशियाने हल्ला करण्यास सुरवात केली. जशी जशी हल्ल्याची भीषणता वाढत होती, तशी आमची धाकधूक वाढत होती. आपण शिकत असलेली उजक्रोड इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी युक्रेनमध्येच हंगेरी सीमेलगत असल्याने तिथे फारसा धोका नव्हता. तरीही काही क्षण अक्षरशः थरकाप उडवणारे होते, असा अनुभव युक्रेनमधून आपल्या घरी, खेर्डी (चिपळूण) येथील पतरलेल्या ऋषभनाथ मोळाज याने मांडला.

वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेला ऋषभनाथ मंगळवारी चिपळुणात दाखल झाला. लोकमतशी बोलताना तो म्हणाला, युक्रेन-रशियाचे वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. युक्रेनचा विकास दर रशियाच्या कितीतरी पटीने अधिक असून, तो विकसित देश आहे. २२ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ले सुरू झाले. विमानतळ, रेल्वेस्थानक तसेच तेथील राष्ट्रीय प्रकल्पांवर बॉम्बहल्ले झाले. त्यामुळे धाकधूक वाढली. त्यावेळी आमच्या परिसरात सायरन वाजवून कर्फ्यू लावण्यात आला. मात्र हे हल्ले ३०० किलोमीटरवर होत असल्याने आम्ही सुरक्षित होतो. विद्यापीठापासून २० किमीवर हंगेरीची सीमा होती. त्यामुळे धोका वाढल्यानंतर शेजारच्या हंगेरी देशात त्वरित स्थलांतराचे नियोजन विद्यापीठाने केले होते. ऐनवेळी हल्ला झाल्यास बंकरमध्ये राहण्याचीही व्यवस्था होती. तिथे असतानाच तीन दिवस संचारबंदी होती.

दरम्यान, भारतीय दूतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचा निर्णय झाल्यावर चिंता काहीशी मिटली. कुटुंबीय आणि नातेवाईक सारखे संपर्कात असायचे. वास्तव्याच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी असल्याने फारशी अडचण झाली नाही. भारतीय दूतावासाकडून आम्हाला सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले. परतीचा प्रवास उजक्रोड, बुडापेस्ट, हंगेरीमार्गे दिल्लीपर्यंत झाला. दिल्लीत विश्रांती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीतून मुंबई व मुंबईतून चिपळूणला मंगळवारी पहाटे ५ वाजता पोहोचलो. घरी आल्यावर आईवडिलांना खूप समाधान वाटले, असे त्याने सांगितले.

मुळात युक्रेनमध्येही विद्यापीठाने भारतीय विद्यार्थ्यासह सर्व विद्यार्थ्यांचीच काळजी घेतली होती. भारतीय दूतावासाचे मोठे सहकार्य लाभल्याने आम्ही सुरक्षित घरी पोहचलो असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली. युक्रेनची परिस्थिती सुधारल्यास पुन्हा जाणार असल्याचेही त्याने सांगितले. मुलगा घरी सुखरूप परतल्याने ऋषभनाथच्या आई, वडील व बहिणीच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाStudentविद्यार्थी