शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीने थरकाप उडाला!, ऋषभनाथने सांगितली तेथील भीषण परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:01 IST

भारतीय दूतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचा निर्णय झाल्यावर चिंता काहीशी मिटली.

संदीप बांद्रे

 

 

चिपळूण : युरोपचे हृदय मानल्या जाणाऱ्या युक्रेनवर ताबा मिळण्यासाठी रशियाकडून अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यावेळी अचानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि तितक्याच तातडीने रशियाने हल्ला करण्यास सुरवात केली. जशी जशी हल्ल्याची भीषणता वाढत होती, तशी आमची धाकधूक वाढत होती. आपण शिकत असलेली उजक्रोड इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी युक्रेनमध्येच हंगेरी सीमेलगत असल्याने तिथे फारसा धोका नव्हता. तरीही काही क्षण अक्षरशः थरकाप उडवणारे होते, असा अनुभव युक्रेनमधून आपल्या घरी, खेर्डी (चिपळूण) येथील पतरलेल्या ऋषभनाथ मोळाज याने मांडला.

वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेला ऋषभनाथ मंगळवारी चिपळुणात दाखल झाला. लोकमतशी बोलताना तो म्हणाला, युक्रेन-रशियाचे वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. युक्रेनचा विकास दर रशियाच्या कितीतरी पटीने अधिक असून, तो विकसित देश आहे. २२ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ले सुरू झाले. विमानतळ, रेल्वेस्थानक तसेच तेथील राष्ट्रीय प्रकल्पांवर बॉम्बहल्ले झाले. त्यामुळे धाकधूक वाढली. त्यावेळी आमच्या परिसरात सायरन वाजवून कर्फ्यू लावण्यात आला. मात्र हे हल्ले ३०० किलोमीटरवर होत असल्याने आम्ही सुरक्षित होतो. विद्यापीठापासून २० किमीवर हंगेरीची सीमा होती. त्यामुळे धोका वाढल्यानंतर शेजारच्या हंगेरी देशात त्वरित स्थलांतराचे नियोजन विद्यापीठाने केले होते. ऐनवेळी हल्ला झाल्यास बंकरमध्ये राहण्याचीही व्यवस्था होती. तिथे असतानाच तीन दिवस संचारबंदी होती.

दरम्यान, भारतीय दूतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचा निर्णय झाल्यावर चिंता काहीशी मिटली. कुटुंबीय आणि नातेवाईक सारखे संपर्कात असायचे. वास्तव्याच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी असल्याने फारशी अडचण झाली नाही. भारतीय दूतावासाकडून आम्हाला सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले. परतीचा प्रवास उजक्रोड, बुडापेस्ट, हंगेरीमार्गे दिल्लीपर्यंत झाला. दिल्लीत विश्रांती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीतून मुंबई व मुंबईतून चिपळूणला मंगळवारी पहाटे ५ वाजता पोहोचलो. घरी आल्यावर आईवडिलांना खूप समाधान वाटले, असे त्याने सांगितले.

मुळात युक्रेनमध्येही विद्यापीठाने भारतीय विद्यार्थ्यासह सर्व विद्यार्थ्यांचीच काळजी घेतली होती. भारतीय दूतावासाचे मोठे सहकार्य लाभल्याने आम्ही सुरक्षित घरी पोहचलो असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली. युक्रेनची परिस्थिती सुधारल्यास पुन्हा जाणार असल्याचेही त्याने सांगितले. मुलगा घरी सुखरूप परतल्याने ऋषभनाथच्या आई, वडील व बहिणीच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाStudentविद्यार्थी