शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Vidhan Sabha 2019 : रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या बंडखोरांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 3:59 PM

पक्षाचा आदेश मानून रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या चारही उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली असून आता रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे भाजप काम करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या बंडखोरांची माघारशिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे भाजप काम करणार

चिपळूण : पक्षाचा आदेश मानून रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या चारही उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली असून आता रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे भाजप काम करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली.चिपळूणमधील माटे सभागृहात सोमवारी दुपारी शिवसेना - भाजपची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, भाजप उमेदवार तुषार खेतल, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, बांधकाम सभापती विनोद झगडे, ज्येष्ठ कर्यकर्ते सुधीर काणे, बाळा कदम यांच्यासह शिवसेना - भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पटवर्धन यांनी राजापूरमधून प्रसाद पाटोळे, संतोष गांगण , चिपळूणमधून तुषार खेतल, गुहागरमधून रामदास राणे, दापोलीमधून केदार साठे या भाजप उमेदवारांनी माघार घेतली असल्याचे जाहीर केले.दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, एकही मतदारसंघ न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज होते. म्हणून आमच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर शिवसेना आणि भाजपची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यावेळी सर्वांना युतीची भूमिका पटवून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार खेतल म्हणाले की, कार्यकत्यार्ना न्याय मिळण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अर्ज दाखल केला होता. मात्र, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष यांनी चर्चा केली. त्यानंतर अर्ज माघारीचा निर्णय घेतल्याचे सांगितले.आमदार सदानंद चव्हाण म्हणाले की, खेतल यांचा अर्ज अपक्ष म्हणून होता. मतदारसंघ न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते पण त्यांनी पक्षादेश मानत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

टॅग्स :BJPभाजपाRatnagiriरत्नागिरीvidhan sabhaविधानसभा