शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग पिछाडीवर

By मेहरून नाकाडे | Updated: September 2, 2022 18:47 IST

मार्चमध्ये झालेल्या दहावी व बारावी परीक्षेत कोकण विभाग निकालात प्रथम क्रमांकावर राहिले आहे.

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे. मार्चमध्ये झालेल्या दहावी व बारावी परीक्षेत कोकण विभाग निकालात प्रथम क्रमांकावर राहिले आहे. पुरवणी परीक्षेत बारावीच्या निकालात कोकण विभाग पिछाडीवर आहे. तर दहावीच्या परीक्षेत सहाव्या क्रमांकावर आहे.कोरोना नंतर प्रथमच विद्यार्थ्यांच्या मार्च/एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जून मध्ये लागला होता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, वर्ष वाया जावू नये यासाठी जुलै/ऑगस्टमध्येच पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहेत. जुलै/ऑगस्टमध्ये झालेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. कोकण विभागाचा बारावी परीक्षेचा निकाल सर्वात कमी अर्थात २५.६६ टक्के लागला आहे. कोकण विभागातील एकूण ५ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. ४५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती पैकी ४५२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, ११६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ३०.१७ टक्के, कला शाखेचा ८.५१ टक्के, वाणिज्य शाखेचा ३५.८६ टक्के तर व्यावसायिक विषयाचा २७.२७ टक्के निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल कला शाखेचा लागला आहे.राज्याच्या निकालाच्या आकडेवारीत कोकण विभाग सर्वात मागे असून २५.६६ टक्के इतका निकाल आहे. सर्वात जास्त औरंगाबाद विभाग ४८ टक्के, व्दितीय क्रमांकावर लातूर विभाग ४२.८८ व तृतीय क्रमांकावर नागपूर विभाग ३९.१३ टक्के आहे.दहावी परीक्षेत सहाव्या क्रमांकावरदहावीच्या परीक्षेतही आघाडीवर असणाऱ्या कोकण बोर्डाचा पुरवणी परीक्षेत मात्र सहावा क्रमांक आहे. कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील ४ व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोन केंद्रावर परीक्षा घेण्यात आल्या. एकूण १२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पैकी ११८ विद्यार्थी परीक्षेला बसले असता अवघे ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ३५.५९ टक्के लागला आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार निकालात कोकण सहाव्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांक लातूर विभागाचा ५१.७४ टक्के, व्दितीय क्रमांक नागपूर विभाग ४५.६५ टक्के, तृतीय क्रमांकांवर औरंगाबाद विभाग ३९.७६ टक्के आहे. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा असून २२.६२ टक्के आहे.दहावीच्या पुरवणी परीक्षेत रत्नागिरी केंद्रावर एक गैर प्रकार आढळला असून त्या विद्यार्थ्याची पुरवणी परीक्षेतील त्या विषयाची संपूर्ण संपादणूक रद्द करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीssc examदहावीHSC Exam Resultबारावी निकालkonkanकोकण