शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

देवरूखात पावसाच्या शिडकाव्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:47 IST

गेली तीन - चार दिवस तालुक्यातील जनतेला वाढलेल्या उष्म्याने हैराण केले होते. गुरूवारी सायंकाळी अवकाळी पावसाने शिडकावा केला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सातत्याने असणारे ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानभरपाईचा विचार करता सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी आंबा बागायतदारांमधून होत आहे.

ठळक मुद्देदेवरूखात पावसाच्या शिडकाव्याने दिलासाचिपळुणातही पावसाची बरसात

देवरूख : गेली तीन - चार दिवस तालुक्यातील जनतेला वाढलेल्या उष्म्याने हैराण केले होते. गुरूवारी सायंकाळी अवकाळी पावसाने शिडकावा केला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सातत्याने असणारे ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानभरपाईचा विचार करता सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी आंबा बागायतदारांमधून होत आहे.वाढलेल्या उन्हामुळे हा उकाडा खूपच वाढला होता. उकाड्याने संगमेश्वरवासीय पुरते हैराण झाले होते. मात्र, गुरूवारी दुपारनंतर वातावरण ढगाळ बनल्यामुळे पावसाची चिन्ह निर्माण झाली होती. सायंकाळी ६.३०च्या सुमारास देवरूख परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली.  अर्धा तास पावसाची रिमझिम सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे काही नागरिकांना घरी परतत असताना पावसात भिजण्याचा आनंद घेता आला.चिपळुणातही पावसाची बरसातचिपळूण शहर परिसरात उन्हाचे चटके चांगलेच जाणवत होते. सकाळी कडाक्याचे ऊन पडले होते. मात्र, दुपारनंतर हवामान ढगाळ झाले होेते. सायंकाळी ७ वाजता पावसाने हजेरी लावली. हवामानात उष्म्याचे प्रमाण वाढले होते. दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणे अवघड झाले होते. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ७ वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी