शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
2
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
3
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
4
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
5
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
6
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
7
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
8
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
9
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
10
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
12
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
13
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
14
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
15
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
16
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
17
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
18
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
19
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
20
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाविषयी केंद्र शासनाने ओबीसींची पिळवणूक थांंबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST

रत्नागिरी : जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. आतापर्यंत शासनाने ओबीसींना त्यांचे हक्क-अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे काम केले. म्हणून संघर्ष ...

रत्नागिरी : जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. आतापर्यंत शासनाने ओबीसींना त्यांचे हक्क-अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे काम केले. म्हणून संघर्ष केल्याशिवाय हक्क मिळणार नाहीत. त्यासाठी ओबीसींनी आपल्या मूलभूत हक्कांसाठी एकत्रित लढा देण्याची गरज आहे, असा सूर शनिवारी रत्नागिरी शहरात झालेले ओबीसी संघर्ष समिती, तालुका रत्नागिरीच्या सभेत होता.

संविधानात तरतूद असूनही गेली ९० वर्षे जातनिहाय जनगणना ओबीसी समाजाची झालेली नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे. शिक्षण आणि रोजगार याविषयी ओबीसी समाजाला वंचित ठेवण्यात आले, अशा अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी ओबीसींचे संघटन करणे आणि त्यांचे हक्क अधिकार मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचे काम ओबीसी संघर्ष समितीने हाती घेतले आहे. शनिवारी तालुक्यात वाटद जिल्हा परिषद गट आणि रत्नागिरी शहरात सभा झाली. या सभांना लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

ओबीसी समाजाला त्यांच्या अधिकारांपासून डावलणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच ठेचायला हवे. तसेच ओबीसी समाजाचे मूळ प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती व ओबीसी नेते कुमार शेट्ये यांनी केले. संविधनाने दिलेले अधिकार आपल्याला माहिती नसतील तर लढणार काय, असा प्रश्न उपस्थित करून अनेक वर्षे प्रतिनिधित्व मिळाले नाही त्यांना आरक्षण मिळावे, असे बाळकृष्ण झोरे यांनी सांगितले. संविधनाने दिलेले अधिकार आपल्याला माहीती नसतील तर लढणार काय, असा प्रश्न उपस्थित करुन अनेक वर्षे प्रतिनिधित्व मिळाले नाही त्यांना आरक्षण मिळावे, असे बाळकृष्ण झोरे यांनी सांगितले.

अनेक वर्षे लढा देऊनही ओबीसी समाजाला न्याय मिळालेला नाही. आपल्या मूलभूत हक्कासाठी न्याय लढा दिला नाही तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही, असे समितीचे उपाध्यक्ष मालप यांनी स्पष्ट केले. आरक्षणविषयी ओबीसींची चाललेली पिळवणूक केंद्र शासनाने थांबवावी. ओबीसींना त्यांच्या हक्क अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे शासनाचे धोरण असून ते थांबवावे व संविधानाचे अधिकार आम्हाला मिळावेत, असा इशारा दीपक राऊत यांनी दिला.

शासनाने ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. आता ही लढाई सभेपूर्ती मर्यादित न रहाता आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. यासाठी ओबीसी संघटना आंदोलन अधिक तीव्र करणार आहे, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते यांनी स्पष्ट केले.

यावेळी समितीचे उपाध्यक्ष राजीव कीर, जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष महेश म्हाप, अल्पसंख्याक नेते हरीश शेकासन, पंचायत समिती सदस्या साक्षी रावणंग, सरचिटणीस सुधीर वसावे, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, माजी नगरसेवक नितीन तळेकर व अन्य उपस्थित होते.