शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ऐकावे ते नवलच! रत्नागिरीत आहे १०० कोटी रुपयांचे झाड; वय पाहून भिरभिराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 18:46 IST

Red Sandalwood tree: काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा देखील आसपसाच्या परिसात केली जाते. पर्यावरण तज्ज्ञ संदीप कांबळे यांनाही रक्तचंदन हे कोकणात आढळून येणे ही बाब दुर्मीळ असल्याचे सांगितले.

- तन्मय दातेलोकमत न्यूज नेटवर्क  रत्नागिरी : तुम्हाला १०० कोटी रुपयांचं झाड पाहायचं आहे का? हे झाड आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील चाफवली या गावातील देवराईमध्ये! या झाडाची किंमत एवढी आहे, कारण हे झाड आहे रक्तचंदनाचे! आणि या झाडाचं वय आहे अंदाजे दीडशे वर्ष. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला प्रचंड मागणी आहे. सध्या स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभाग या झाडावर लक्ष ठेवून आहेत. (Red Sandalwood tree worth Rs 100 crore in Ratnagiri; age is around 150 years)

रक्त चंदन हे विशेषता तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील चित्तुर,कडप्पा, कुरनुल आणि नेल्लोर चार जिल्ह्यांमध्ये  आढळतात. ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, चीन इत्यादी ठिकाणी याचा मोठा व्यापार होतो. त्यामुळे कोकणात हे झाड आले कसे?  याची माहिती कोणालाही नाही.‘खरं’सांगायचं झालं तर हे झाड इथं आले कसे याची गावातील कुणालाही कल्पना नाही. साधारण ३० ते ४० वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये कातभट्टी चालायच्या. त्यावेळी  कातकरी समाज हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असे. त्यांचे बैल जेव्हा आजारी पडायचे तेव्हा ते या झाडाची साल उगाळून देत असतं. त्यानंतर हे बैल ठणठणीत होत. त्यामुळे हे झाड औषधी आहे हे आम्हा गावकऱ्यांना माहितीचे होते. काही वर्षांपुर्वी या ठिकाणाची झाडं तोडली गेली पण जी झाड औषधी व दुर्मिळ झाड तोडायची नाहीत, असा एकमुखी निर्णय झाला. पाच वर्षापूर्वी कुणीतरी अभ्यास केला व याचा गर काढून हे झाड रक्त चंदनाचे आहे असे सांगितले. पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत किंवा इंग्रजांनी या देवराईत ते लावले आसावे, असा अंदाज गावातील प्रकाश चाळके यांनी व्यक्त केला.

काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा  देखील आसपसाच्या परिसात केली जाते. यानंतर देवरूख वनविभागाचे वनपाल तौफिक मुल्ला यांनी ‘सध्या झाडाच्या सुरक्षेसाठी आम्हीदेखील ठराविक अंतरानंतर, वेळेनंतर याठिकाणी गस्त घालत असतो. शिवाय महसूल विभागही लक्ष ठेवून आहे. मुख्य बाब म्हणजे गावकऱ्याचा सहभागदेखील मोठा आहे. यावेळी त्यांच्यासोबत वनरक्षक मिलींद डाफळे, न्हानू गावडे होते.पर्यावरण तज्ज्ञ संदीप कांबळे यांनाही रक्तचंदन हे कोकणात आढळून येणे ही बाब दुर्मीळ असल्याचे सांगितले. बाजारात सध्या रक्तचंदनाला पाच ते सहा हजार रूपये प्रति किलो असा दर आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforestजंगल