शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोकणात ‘केरा केरलम’वाणाच्या लागवडीसाठी शिफारस, वैशिष्ट्ये काय.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:31 IST

उत्पन्नात भारत प्रथम क्रमांकावर

रत्नागिरी : कोकणात नारळाचे अधिक उत्पादन देणाऱ्या ‘केरा केरलम’ वाणाची लागवड करण्यासाठी रत्नागिरीतील भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशाेधन केंद्राने शिफारस केली आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे झालेल्या ५३ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीमध्ये ही शिफारस करण्यात आली आहे.महाराष्ट्रात नारळाचे उत्पादन मुख्यत्वे कोकण किनारपट्टीत घेतले जाते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नारळ पिकाखाली क्षेत्र अधिक आहे. अलीकडच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात क्षेत्र विस्तार होत आहे. कोकणामध्ये पारंपरिकपणे ‘बाणवली’ या उंच माडाची लागवड आहे.

कोकण कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने सन २०११ पासून भारतामध्ये विकसित झालेल्या विविध नारळ जातींचा तुलनात्मक अभ्यास सुरू केला. या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार नारळाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या ‘केरा केरलम’ हे वाण आशादायी आढळले.

परभणी येथे झालेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीमध्ये नारळामधील ‘केरा केरलम’ या वाणाची लागवडीसाठी शिफारस केली आहे. या संशोधन कार्यात नारळ संशाेधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे, डॉ. दिलीप नागवेकर, डॉ. राजन खांडेकर, डॉ. वैभव शिंदे, डॉ. सुनील घवाळे, डॉ. संतोष वानखेडे, डॉ. पराग हळदणकर यांचे योगदान आहे.

उत्पन्नात भारत प्रथम क्रमांकावरजगामध्ये ९० हून अधिक देशात नारळ हे पीक घेतले जाते. भारत हा जगातील एक प्रमुख नारळ उत्पादक देश आहे. भारतामध्ये नारळ पिकाखाली २१.९० लाख हेक्टर क्षेत्र असून, २१,२०७ दशलक्ष नारळ उत्पादन आहे. जगाच्या उत्पन्नाच्या एकूण ३१ टक्के उत्पन्न हे भारतात होते. भौगोलिक क्षेत्रात भारताचे स्थान १७.१५ तृतीय क्रमांकावर असले तरी उत्पन्नात प्रथम क्रमांकावर आहे.‘केरा केरलम’ची वैशिष्ट्ये‘केरा केरलम’ नारळाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रती माड प्रती वर्ष ११८ फळांचे सरासरी उत्पादन आहे. खोबरे प्रती नारळ १७० ग्रॅम, तेलाचे प्रमाण ६९ टक्के आहे, तसेच त्याच्या उत्पन्नामध्ये सातत्य आहे.