शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दिला कच्चा भात, ताटंही लावलीत धुवायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 17:03 IST

शालेय पोषण आहाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

रत्नागिरी : शालेय पोषण आहार वाटपासाठी नव्याने नियुक्त केलेल्या काेल्हापुरातील संस्थेने रा. भा. शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांना चक्क कच्च्या भाताचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार साेमवारी उघडकीला आला. मुलांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाल्यानंतर पालिकेच्या शिक्षण मंडळात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शालेय पोषण आहाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.यापूर्वी शासनाकडून शाळांना धान्य पुरवठा केला जात हाेता. त्यानंतर शाळेने नेमलेल्या बचत गटाकडून विद्यार्थ्यांना आहार दिला जात हाेता. नव्या शैक्षणिक वर्षापासून आहाराचे वाटप बचत गटाकडून काढून निविदा प्रक्रियेद्वारे परजिल्ह्यातील तीन संस्थांना ठेका देण्यात आला आहे. रत्नागिरी नगर पालिका व पालिका शिक्षण मंडळ यांच्यामार्फत ही प्रक्रिया राबविण्यात आली.नव्या संस्थांमार्फत १ ऑगस्टपासून पोषण आहार पुरवठ्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी शहरातील रा. भा. शिर्के  प्रशालेत पाेषण आहार पुरवठा करणाऱ्या काेल्हापूर येथील संस्कार महिला मंडळ या संस्थेने कच्चा भात विद्यार्थ्यांना वाढला, तर विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या भातात केसही आढळले. विद्यार्थ्यांनी याची माहिती मुख्याध्यापकांना दिल्यानंतर पोषण आहारचे वाटप तत्काळ थांबविण्याची सूचना केली.या प्रकाराबाबत माहिती मिळताच शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुनील पाटील यांनी तत्काळ शाळेला भेट देऊन दुसऱ्या संस्थेकडून पोषण आहार मागविला आणि त्यानंतर पुन्हा आहाराचे वाटप सुरू झाले. मात्र, मुलांना तब्बल तासभर आहाराशिवायच राहावे लागले, तर शैक्षणिक तासिकेतील दोन तास वाया गेले. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थ्यांनी धुतली ताटंसंस्थांना ठेका देताना पोषण आहाराची ताटं संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छ करण्याची अट आहे. मात्र, संस्थेने विद्यार्थ्यांनाच त्यांची ताटं स्वच्छ करायला लावल्याचा प्रकारही पुढे आला.

पोषण आहारात विद्यार्थ्यांना कच्चा भात पुरवला, वरणाला चव नव्हती ही वस्तुस्थिती आहे. आपण स्वत: शाळेतील पोषण आहाराची तपासणी केली आहे. शाळेचा अहवाल आल्यानंतर संस्थेला लेखी स्वरूपात नोटीस दिली जाणार आहे.  - सुनील पाटील, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ, रत्नागिरी. 

सुरुवातीला आहार घेतलेल्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी भात कच्चा असल्याची तक्रार केल्यानंतर आम्ही खातरजमा केली. मी आहार पुरवठा बंद करून याची माहिती पालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दिली. या आहारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. - रमेश चव्हाण, प्रभारी मुख्याध्यापक, रा. भा. शिर्के प्रशाला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळाStudentविद्यार्थी