शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दिला कच्चा भात, ताटंही लावलीत धुवायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 17:03 IST

शालेय पोषण आहाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

रत्नागिरी : शालेय पोषण आहार वाटपासाठी नव्याने नियुक्त केलेल्या काेल्हापुरातील संस्थेने रा. भा. शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांना चक्क कच्च्या भाताचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार साेमवारी उघडकीला आला. मुलांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाल्यानंतर पालिकेच्या शिक्षण मंडळात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शालेय पोषण आहाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.यापूर्वी शासनाकडून शाळांना धान्य पुरवठा केला जात हाेता. त्यानंतर शाळेने नेमलेल्या बचत गटाकडून विद्यार्थ्यांना आहार दिला जात हाेता. नव्या शैक्षणिक वर्षापासून आहाराचे वाटप बचत गटाकडून काढून निविदा प्रक्रियेद्वारे परजिल्ह्यातील तीन संस्थांना ठेका देण्यात आला आहे. रत्नागिरी नगर पालिका व पालिका शिक्षण मंडळ यांच्यामार्फत ही प्रक्रिया राबविण्यात आली.नव्या संस्थांमार्फत १ ऑगस्टपासून पोषण आहार पुरवठ्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी शहरातील रा. भा. शिर्के  प्रशालेत पाेषण आहार पुरवठा करणाऱ्या काेल्हापूर येथील संस्कार महिला मंडळ या संस्थेने कच्चा भात विद्यार्थ्यांना वाढला, तर विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या भातात केसही आढळले. विद्यार्थ्यांनी याची माहिती मुख्याध्यापकांना दिल्यानंतर पोषण आहारचे वाटप तत्काळ थांबविण्याची सूचना केली.या प्रकाराबाबत माहिती मिळताच शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुनील पाटील यांनी तत्काळ शाळेला भेट देऊन दुसऱ्या संस्थेकडून पोषण आहार मागविला आणि त्यानंतर पुन्हा आहाराचे वाटप सुरू झाले. मात्र, मुलांना तब्बल तासभर आहाराशिवायच राहावे लागले, तर शैक्षणिक तासिकेतील दोन तास वाया गेले. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थ्यांनी धुतली ताटंसंस्थांना ठेका देताना पोषण आहाराची ताटं संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छ करण्याची अट आहे. मात्र, संस्थेने विद्यार्थ्यांनाच त्यांची ताटं स्वच्छ करायला लावल्याचा प्रकारही पुढे आला.

पोषण आहारात विद्यार्थ्यांना कच्चा भात पुरवला, वरणाला चव नव्हती ही वस्तुस्थिती आहे. आपण स्वत: शाळेतील पोषण आहाराची तपासणी केली आहे. शाळेचा अहवाल आल्यानंतर संस्थेला लेखी स्वरूपात नोटीस दिली जाणार आहे.  - सुनील पाटील, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ, रत्नागिरी. 

सुरुवातीला आहार घेतलेल्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी भात कच्चा असल्याची तक्रार केल्यानंतर आम्ही खातरजमा केली. मी आहार पुरवठा बंद करून याची माहिती पालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दिली. या आहारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. - रमेश चव्हाण, प्रभारी मुख्याध्यापक, रा. भा. शिर्के प्रशाला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळाStudentविद्यार्थी