शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

हापूसमुळे रत्नागिरी जिल्हा देशात पहिला; ‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 16:21 IST

दिल्लीत सोमवारी पुरस्कार वितरण झाले

रत्नागिरी : ‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवड झालेल्या १४ जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांची वर्णी लागली आहे. यात रत्नागिरीच्या हापूस आंब्याने ‘सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा’ म्हणून रत्नागिरीला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून दिला असून तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. नाशिक, अमरावती, नागपूर आणि अकोला हे अनुक्रमे द्वितीय ते पाचव्या क्रमांकाचे विजेते ठरले आहेत. दिल्लीत सोमवारी पुरस्कार वितरण झाले.‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन’च्या माध्यमातून देशातील प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्पादन निवडून त्या उत्पादनाचे ब्रॅण्डिंग करणे व प्रोत्साहन देणे, जेणेकरून देशांतील संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळेल व देशभरामध्ये समग्र सामाजिक व आर्थिक वाढ शक्य होईल, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम देशामध्ये राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागामार्फत या पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तरावरून केलेल्या भौतिक पडताळणीमध्ये महाराष्ट्रातून नाशिक, अमरावती, नागपूर, अकोला, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, अहिल्यानगर, बीड, भंडारा, बुलढाणा, धुळे व गोंदिया या १४ जिल्ह्यांची निवड झाली होती.भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सहव्यवस्थापक ताशी डोज शेर्पा यांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी रत्नागिरी जिल्ह्याला भेट देत ‘हापूस आंबा’ या उत्पादनाशी निगडित उद्योगांना भेट देऊन आढावा घेतला होता. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सादरीकरण केले होते.अखेर रत्नागिरी जिल्ह्याच्या हापूसने देशात प्रथम पुरस्कार मिळवत जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. सोमवारी (दि. १४ जुलै) दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री रेखा गुप्ता, राज्याच्या वाणिज्य व उद्योग विभागाचे मंत्री जतीन प्रसाद उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्राचे माजी महाव्यवस्थापक हणबर, आताचे महाव्यवस्थापक अजिंक्य आसगेकर, जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा पणन अधिकारी मिलिंद जोशी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संकेत कदम यांनीही योगदान दिले.