शहरं
Join us  
Trending Stories
1
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
2
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
3
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
4
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
5
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
6
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
7
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
8
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
9
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
10
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
11
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
12
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
13
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
14
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
15
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
16
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
17
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
18
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
19
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
20
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल

हापूसमुळे रत्नागिरी जिल्हा देशात पहिला; ‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 16:21 IST

दिल्लीत सोमवारी पुरस्कार वितरण झाले

रत्नागिरी : ‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवड झालेल्या १४ जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांची वर्णी लागली आहे. यात रत्नागिरीच्या हापूस आंब्याने ‘सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा’ म्हणून रत्नागिरीला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून दिला असून तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. नाशिक, अमरावती, नागपूर आणि अकोला हे अनुक्रमे द्वितीय ते पाचव्या क्रमांकाचे विजेते ठरले आहेत. दिल्लीत सोमवारी पुरस्कार वितरण झाले.‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन’च्या माध्यमातून देशातील प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्पादन निवडून त्या उत्पादनाचे ब्रॅण्डिंग करणे व प्रोत्साहन देणे, जेणेकरून देशांतील संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळेल व देशभरामध्ये समग्र सामाजिक व आर्थिक वाढ शक्य होईल, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम देशामध्ये राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागामार्फत या पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तरावरून केलेल्या भौतिक पडताळणीमध्ये महाराष्ट्रातून नाशिक, अमरावती, नागपूर, अकोला, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, अहिल्यानगर, बीड, भंडारा, बुलढाणा, धुळे व गोंदिया या १४ जिल्ह्यांची निवड झाली होती.भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सहव्यवस्थापक ताशी डोज शेर्पा यांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी रत्नागिरी जिल्ह्याला भेट देत ‘हापूस आंबा’ या उत्पादनाशी निगडित उद्योगांना भेट देऊन आढावा घेतला होता. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सादरीकरण केले होते.अखेर रत्नागिरी जिल्ह्याच्या हापूसने देशात प्रथम पुरस्कार मिळवत जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. सोमवारी (दि. १४ जुलै) दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री रेखा गुप्ता, राज्याच्या वाणिज्य व उद्योग विभागाचे मंत्री जतीन प्रसाद उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्राचे माजी महाव्यवस्थापक हणबर, आताचे महाव्यवस्थापक अजिंक्य आसगेकर, जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा पणन अधिकारी मिलिंद जोशी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संकेत कदम यांनीही योगदान दिले.