शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

टीईटी घोटाळ्यातील ‘त्या’ नऊ शिक्षकांना नियुक्ती नाही, रत्नागिरी जिल्हा परिषदेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 12:52 IST

रत्नागिरी : टीईटी घोटाळ्यातील नऊ शिक्षकांना नियुक्ती देण्यास रत्नागिरी जिल्हा परिषदेने नकार दिला आहे. पुणे पाेलिसांच्या अहवालात या नऊ ...

रत्नागिरी : टीईटी घोटाळ्यातील नऊ शिक्षकांना नियुक्ती देण्यास रत्नागिरी जिल्हा परिषदेने नकार दिला आहे. पुणे पाेलिसांच्या अहवालात या नऊ शिक्षकांवर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना जिल्हा परिषदेचे दार कायमचे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शिक्षक भरतीतील १ हजार १६ उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्तीपत्र देण्यात आले होते. या भरती प्रक्रियेत २६ उमेदवार गैरहजर राहिले होते. या भरती प्रक्रियेच्या वेळी टीईटी घोटाळ्यातील ९ शिक्षक उमेदवार सहभागी झाल्याचे प्रशासनासमोर आले होते. हे सर्व उमेदवार परजिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले होते.टीईटीप्रकरणी गैरमार्ग अवलंबविणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे नोंदविण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले होते. टीईटी घोटाळ्यातील सुमारे ४०० शिक्षक उमेदवार न्यायालयाच्या आदेशान्वये स्व-प्रमाणपत्र भरून शिक्षक भरती प्रक्रियेत समाविष्ट झाले हाेते. प्रत्यक्षात त्यातील ११६ उमेदवारांचा शिक्षक म्हणून निवड यादीत समावेश झाला होता. या उमेदवारांनी बनावट टीईटी प्रमाणपत्र वापरलेले नाही, तर केवळ बीएडच्या आधारे नववी ते बारावीसाठी शिक्षक म्हणून नियुक्ती मिळविली होती.या भरती प्रक्रियेमध्ये रत्नागिरीतही टीईटी घोटाळ्यातील उमेदवार असल्याचे समोर आले हाेते. त्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली हाेती. त्या नऊही उमेदवारांना नियुक्तीपत्र द्यावे की नाही, याबाबत शिक्षण विभागाने अहवाल मागविला होता. पुणे पाेलिसांचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये नऊही जणांवर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट कळविण्यात आले आहे; मात्र त्यामध्ये त्यांना नियुक्ती द्यावी की नाही, याबाबत काहीही कळविलेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने त्या उमेदवारांना नियुक्तीपत्र न देण्याचा निर्णय घेतला आहे.पात्रता परीक्षा २०१९ मधील गैरप्रकारामध्ये ७,८७४ परीक्षार्थी व शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ मधील गैरप्रकारामध्ये १,६६३ परीक्षार्थी असे एकूण ९,५३७ परीक्षार्थी सहभागी आहेत. संबंधित गैरप्रकारातील परीक्षार्थींची परीक्षेतील संपादणूक रद्द करण्यात आली होती.तसेच त्यांना यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले होते; परंतु त्यातील परीक्षार्थी पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये न्यायालयाच्या आदेशान्वये स्व-प्रमाणपत्र भरून समाविष्ट झाले. त्यापैकी काही उमेदवारांची या भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक म्हणून निवड झाली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTeacherशिक्षक